शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

आरटीई प्रवेशाचे पुण्यातून सर्वाधिक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 02:30 IST

सहा दिवसांत ९० हजार अर्ज; नागपुरात जागांपेक्षा जास्त अर्ज

पुणे : शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राज्यभरातील पालकांची झुंबड उडाली आहे. केवळ सहा दिवसांतच राज्यभरातून तब्बल ९० हजारांहून अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक २१ हजारांहून अधिक अर्ज एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत, तर पुण्यासह नागपूर जिल्ह्यात सहा दिवसांतच प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.शिक्षण विभागाकडून दि. ५ मार्चपासून आरटीई प्रवेशाची आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पालकांना आरटीईचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅपवरून अर्ज भरण्यासाठी उपलब्ध आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही प्रक्रिया सुरू आहे. राज्यात या प्रक्रियेमध्ये एकूण ९ हजार १९४ शाळांमधील १ लाख १६ हजार ८०३ जागा आरटीईसाठी आरक्षित आहेत. त्यासाठी मागील सहा दिवसांतच ९० हजार ७५१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १३७ अर्ज अ‍ॅपवरून भरण्यात आले आहेत. अर्ज भरण्यासाठी दि. २२ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यामुळे सध्याचा प्रतिसाद पाहता प्रवेश क्षमतेपेक्षा अर्जांची संख्या अधिक होण्याची शक्यता आहे.राज्यात सर्वाधिक १६ हजार ६१६ जागा पुणे जिल्ह्यात आहेत. त्यासाठी २१ हजारांहून अधिक पालकांनी अर्ज केला आहे. ही परिस्थिती नागपूर जिल्ह्यातही आहे. येथील सुमारे ७ हजार जागांसाठी तब्बल सुमारे १३ हजार अर्ज आले आहेत. अकोला, अमरावती, भंडारा, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातही उपलब्ध जागांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. तर इतर काही जिल्ह्यांमध्येही पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुढील काही दिवसांत या जिल्ह्यांतील अर्जांची संख्याही क्षमतेपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हजारो इच्छुक पालकांच्या पाल्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.अनेक जिल्ह्यात प्रतिसादच मिळेनाकाही जिल्ह्यांमध्ये मात्र अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सिंधुदुर्ग व नंदुरबार जिल्ह्यात अनुक्रमे ५० व ९२ अर्ज आले आहेत. ठाणे जिल्ह्यात १३ हजार ४०० प्रवेशांसाठी केवळ ६ हजार ४१९ पालकांनी अर्ज केले आहेत.मुंबईची हीच स्थिती आहे. सुमारे १० हजार जागांसाठी २ हजार अर्ज आलेले आहे. अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत हीच स्थिती कायम राहिल्यास मुंबईसह ठाणे व इतर काही जिल्ह्यांतील जागा रिक्त राहतील.