शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

पाण्याच्या शोधार्थ मोरांची भटकंती

By admin | Updated: April 19, 2017 04:12 IST

आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे

न्हावरे : आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे. दरम्यान, या परिसरातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील आंबळे, आनोसेवाडी, मोटेवाडी, गोलेगाव, भोसवाडी, थेऊरकरवाडी, दहीवडी, पारोडी, भांबर्डे या परिसरात अनेक वर्षांपासून मोरांचे अस्तित्व आहे. दहा वर्षांपूर्वी या भागात चासकमान प्रकल्पाचे पाणी फिरल्याने मोरांना पिण्याचे पाणी, नैसर्गिक खाद्य उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे या भागात दिवसेंदिवस मोरांची संख्या वाढू लागली आहे. काही दिवसांपासून या भागातील लघुपाटबंधारे, पाझर तलाव, ओढे, नाले आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोरांना रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर सध्या या भागात मोरासाठीचे नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे खाद्यही संपुष्टात आले आहे. बहुतेक शेतकरी आपल्या घरातील धान्य मोरांसाठी खायला टाकतात. या भागात मोर, पक्षी इतके माणसाळलेले आहेत की, त्यांचा वावर शेतकऱ्यांच्या शेतापाासून जनावरांच्या गोठ्यापर्यंत, एवढेच नाही तर अगदी घरापर्यंत असल्याचा दिसून येतो.(वार्ताहर)या भागातील शेतकरी आपल्या घरातील अन्नधान्य मोरांना खाण्यासाठी टाकतात. तसेच, काळजीने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. मात्र, मोरांबाबत काही दुर्घटना घडल्यास त्याचा वनविभागाकडून होणारा नाहक बडगा अथवा कारवाईचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मोरांना अन्नपाणी पुरवताना शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, मोर आपल्या परिसराचे एक वैभव आहे. या भावनेपोटी कसल्याही कारवाईच्या भीतीला न जुमानता आपण मोरांना अन्नधान्य पुरवतो, असे येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या भागातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्था व वनविभाग पुढाकार घेणे गरजेचे आहे.