शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पाण्याच्या शोधार्थ मोरांची भटकंती

By admin | Updated: April 19, 2017 04:12 IST

आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे

न्हावरे : आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे. दरम्यान, या परिसरातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील आंबळे, आनोसेवाडी, मोटेवाडी, गोलेगाव, भोसवाडी, थेऊरकरवाडी, दहीवडी, पारोडी, भांबर्डे या परिसरात अनेक वर्षांपासून मोरांचे अस्तित्व आहे. दहा वर्षांपूर्वी या भागात चासकमान प्रकल्पाचे पाणी फिरल्याने मोरांना पिण्याचे पाणी, नैसर्गिक खाद्य उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे या भागात दिवसेंदिवस मोरांची संख्या वाढू लागली आहे. काही दिवसांपासून या भागातील लघुपाटबंधारे, पाझर तलाव, ओढे, नाले आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोरांना रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर सध्या या भागात मोरासाठीचे नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे खाद्यही संपुष्टात आले आहे. बहुतेक शेतकरी आपल्या घरातील धान्य मोरांसाठी खायला टाकतात. या भागात मोर, पक्षी इतके माणसाळलेले आहेत की, त्यांचा वावर शेतकऱ्यांच्या शेतापाासून जनावरांच्या गोठ्यापर्यंत, एवढेच नाही तर अगदी घरापर्यंत असल्याचा दिसून येतो.(वार्ताहर)या भागातील शेतकरी आपल्या घरातील अन्नधान्य मोरांना खाण्यासाठी टाकतात. तसेच, काळजीने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. मात्र, मोरांबाबत काही दुर्घटना घडल्यास त्याचा वनविभागाकडून होणारा नाहक बडगा अथवा कारवाईचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मोरांना अन्नपाणी पुरवताना शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, मोर आपल्या परिसराचे एक वैभव आहे. या भावनेपोटी कसल्याही कारवाईच्या भीतीला न जुमानता आपण मोरांना अन्नधान्य पुरवतो, असे येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या भागातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्था व वनविभाग पुढाकार घेणे गरजेचे आहे.