शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पाण्याच्या शोधार्थ मोरांची भटकंती

By admin | Updated: April 19, 2017 04:12 IST

आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे

न्हावरे : आंबळे, कळवंतवाडी, आनोसेवाडी (ता. शिरूर) परिसरात पाणीसाठे संपुष्टात आल्याने अन्न-पाण्याच्या शोधासाठी मोरांची वणवण सुरू झाली आहे. दरम्यान, या परिसरातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या भागातील ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.शिरूर तालुक्याच्या पूर्वभागातील आंबळे, आनोसेवाडी, मोटेवाडी, गोलेगाव, भोसवाडी, थेऊरकरवाडी, दहीवडी, पारोडी, भांबर्डे या परिसरात अनेक वर्षांपासून मोरांचे अस्तित्व आहे. दहा वर्षांपूर्वी या भागात चासकमान प्रकल्पाचे पाणी फिरल्याने मोरांना पिण्याचे पाणी, नैसर्गिक खाद्य उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे या भागात दिवसेंदिवस मोरांची संख्या वाढू लागली आहे. काही दिवसांपासून या भागातील लघुपाटबंधारे, पाझर तलाव, ओढे, नाले आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी मोरांना रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे. त्याचबरोबर सध्या या भागात मोरासाठीचे नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे खाद्यही संपुष्टात आले आहे. बहुतेक शेतकरी आपल्या घरातील धान्य मोरांसाठी खायला टाकतात. या भागात मोर, पक्षी इतके माणसाळलेले आहेत की, त्यांचा वावर शेतकऱ्यांच्या शेतापाासून जनावरांच्या गोठ्यापर्यंत, एवढेच नाही तर अगदी घरापर्यंत असल्याचा दिसून येतो.(वार्ताहर)या भागातील शेतकरी आपल्या घरातील अन्नधान्य मोरांना खाण्यासाठी टाकतात. तसेच, काळजीने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. मात्र, मोरांबाबत काही दुर्घटना घडल्यास त्याचा वनविभागाकडून होणारा नाहक बडगा अथवा कारवाईचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मोरांना अन्नपाणी पुरवताना शेतकऱ्यांची मोठी कुचंबणा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, मोर आपल्या परिसराचे एक वैभव आहे. या भावनेपोटी कसल्याही कारवाईच्या भीतीला न जुमानता आपण मोरांना अन्नधान्य पुरवतो, असे येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, या भागातील मोरांचे अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक संस्था व वनविभाग पुढाकार घेणे गरजेचे आहे.