शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोरोना काळातील दीड हजारांहून अधिक दोषारोपपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:11 IST

पुणे : कोरोना काळात केलेल्या नियमभंगावर शहर पोलिसांनी १८८ कलमानुसार लोकांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात आता शहरातील पोलीस ...

पुणे : कोरोना काळात केलेल्या नियमभंगावर शहर पोलिसांनी १८८ कलमानुसार लोकांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात आता शहरातील पोलीस ठाण्यांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास गती घेतली आहे. शहरातील

सर्व ३० पोलीस ठाण्यांना याबाबत न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात शहरातील विविध न्यायालयात एक हजारांहून अधिक दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयातून संबंधितांना नोटीस काढण्यात येत असून पोलिसांकडून ही नोटीस लोकांना घरी जाऊन बजावण्यास सुरुवात झाली असल्याचे माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली.

शहरात कोरोना काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात कारण नसता घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी १८८ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या काळात २८ हजारांहून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या गुन्ह्यांची निर्गती करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल झालेल्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडून माहिती घेऊन दोषारोप पत्र तयार करुन न्यायालयात दाखल करण्यात येत आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतून आतापर्यंत जवळपास प्रत्येकी ५० हून अधिक दोषारोपपत्र दाखल केली गेली आहेत. न्यायालयाने आता संपूर्ण वेळ सुरु झाल्याने या प्रक्रियेने वेग घेतला आहे. न्यायालयाच्या वेळेनुसार संबंधितांना नोटीस काढण्यात येत आहे. न्यायालयाची नोटीस पोलीस घरी जाऊन बजावत असून त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले जात आहे. न्यायालयाकडून गुन्हा दाखल झालेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.