शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

मोदी सरकारचा संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव : पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 15:15 IST

भाजप सरकारला संविधान, संघराज्य व्यवस्था, कायद्याचे राज्य, धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे मान्य नाहीत.

पुणे : भाजप सरकारला संविधान, संघराज्य व्यवस्था, कायद्याचे राज्य, धर्मनिरपेक्षता ही तत्त्वे मान्य नाहीत. त्यांचे बेगडी राष्ट्रप्रेम विषमता आणि द्वेष यावर आधारलेले असल्याने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये कारभार आणि वर्तणुकीत दिसत नाहीत. संसद, न्यायपालिका, कार्यपालिका यांनी एकमेकांच्या अधिकारावर अंकुश ठेवणे अपेक्षित आहे. मात्र मोदी सरकारने संघराज्य व्यवस्था मोडीत काढण्याचा डाव आखला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

सध्या कोरोनाचे संकट अधिकच बिकट झाले आहे. मात्र वैद्यकीय सुविधांवरील खर्च वाढवण्याऐवजी वीस हजार कोटींचे संसद भवन, बुलेट ट्रेन, पुतळे यावर पैसे खर्च करण्यात सरकार व्यस्त आहे, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याचेही ते म्हणाले.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित आॅनलाइन वसंत व्याख्यानमालेत 'केंद्र-राज्य संबंध' या विषयावर ते बोलत होते.

यूपीए सरकारच्या काळात केंद्र आणि राज्य संबंध चांगले होते. केंद्रातील विरोधी पक्षांचे राज्यांमध्ये सरकार असले तरी संवादाची प्रक्रिया सुरू होती. मित्र आणि विरोधी पक्षांसोबत सतत चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन धोरणे आखली जात होती. परंतु, या कार्यशैलीचा सध्या अभाव दिसत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

'दिल्लीत उपराज्यपालांना सर्व अधिकार देऊन घटनेची पायमल्ली करून जनतेने निवडून दिलेल्या आप सरकारची कोंडी करणे सुरू आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, कर्नाटक आणि मध्यप्रदेश येथे लोकांनी निवडून दिलेले सरकार केंद्रातील पाशवी बहुमताच्या जोरावर बरखास्त करून इतर पक्षांना सत्तेत येऊ न देण्याचे घातक प्रकार करण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून इतर सरकारांना आणि जनतेला त्रास देण्याचे उद्योग सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

--------

मला भाषण करू दिले नाही....

मे २०१९ मध्ये सत्तांतर झाले आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काही महिने काम करीत होतो. मोदी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. राजशिष्टाचारामुळे मी मोदींच्या दौऱ्यात सहभागी झालो. सुरुवातीला प्रास्ताविक झाल्यानंतर माझे भाषण सुरू झाले. तेव्हा प्रेक्षकातून ‘मोदी मोदी’ घोषणा सुरू झाल्या आणि मला भाषण करू दिले नाही.... महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्राचा हा अपमान होता. मी माझे भाषण थांबवले. त्यानंतर मोदींच्या एकाही महाराष्ट्र दौऱ्यात मी सहभागी झालो नाही.... साधा राजशिष्टाचार देखील मोदींच्या दौऱ्यात पाळला गेला नाही....असा कटू अनुभव पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला.

---------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण