शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

संमेलनात साहित्य, संस्कृतीची थट्टा

By admin | Updated: October 12, 2016 03:03 IST

‘साहित्य संमेलनांमध्ये केवळ बडेजावपणा, ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जाते. त्यातून साहित्य, संस्कृतीची थट्टा केली जाते. त्यामुळे मी संमेलनांकडे फिरकणारही नाही

पुणे : ‘साहित्य संमेलनांमध्ये केवळ बडेजावपणा, ऐश्वर्याचे प्रदर्शन केले जाते. त्यातून साहित्य, संस्कृतीची थट्टा केली जाते. त्यामुळे मी संमेलनांकडे फिरकणारही नाही. आधी भालचंद्र नेमाडेंना अध्यक्ष करा; मग मी विचार करेन. नेमाडे कदापि संमेलनात येणार नाहीत. त्यामुळे माझा प्रश्नच उद्भवत नाही’, अशी टिपण्णी ‘ताम्रपट’कार ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथप्रदर्शनांमधून कोट्यवधींची उलाढाल होते, हे मोठे बळ आहे; मात्र लेखकांच्या मागण्या अचंबित करणाऱ्या असतात. या मागण्या पूर्ण करून, त्यांचे योगदान काय असते,’ असा सवाल करीत, ‘लेखकांचा खर्च प्रकाशकांनी करायला हवा. संयोजकांनी खर्च करण्याचे कारण नाही; पण सध्याचे संयोजक सधन आहेत’, असे टीकास्त्र पठारे यांनी सोडले. ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे असल्याने आता केवळ हा राजकीय इच्छाशक्तीचा मुद्दा आहे,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)