शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

मोबाइल जॅमर चाललेच नाहीत! यूपीएससी पूर्वपरीक्षा केंद्रांवरील प्रकार, १२ हजार ३७२ उमेदवार अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 05:53 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली.

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली. त्याचवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहोचण्यास थोडाही उशीर झाला तर त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यास आडकाठी करण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.यूपीएससी पूर्वपरीक्षेत मोबाइलचा वापर करून गैरप्रकार करण्याचे काही प्रकार उजेडात आल्याने यंदा परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर बसविण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी हे मोबाइल जॅमर कार्यान्वितच झाले नाहीत. यामुळे यंदा तरी हा प्रयोग यशस्वी होऊ शकलेला नाही. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एकीकडे नियमावर बोट ठेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरायचे आणि दुसरीकडे मोबाइल जॅमरसारख्या उपाययोजना मात्र फेल ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शहरातील ७४ परीक्षा केंद्रांवर यूपीएससीची पूर्वपरीक्षा पार पडली. पुणे शहरातून ३० हजार ४३० विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरला होता, मात्र १८ हजार ३०१ उमेदवारांनीच ही परीक्षा दिली. तब्बल १२ हजार १२९ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिले. परीक्षेला अनुपस्थित राहण्याचे प्रमाण यंदा खूपच मोठे राहिले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी दोन तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास पाच-दहा मिनिटे उशीर झाला तरी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे त्यांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी (पान ५ वर)२.३० ते ४.३० अशी परीक्षेची वेळ होती.परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर ५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक उमेदवारांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंद्रात वेळेपूर्वी दोन तास अगोदर हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी धावपळ करावी लागली. त्याचबरोबर दोन पेपरच्या मध्येही खूप जास्तीचा गॅप ठेवण्यात आला होता. त्याचाही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. एका विद्यार्थींनीला परीक्षा केंद्रात पोहचण्यास ५ मिनिटेच उशीर झाला होता, मात्र तिला प्रवेश दिला नाही अशी तक्रार तिने केली आहे.पहिलाच प्रयोगअसल्याने अडचणीपरीक्षा केंद्रावर पहिल्यांदाच मोबाइल जॅमर बसविण्यात येत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पहिल्या सत्रात ते सुरू करता आले नाहीत. दुसºया सत्रात मात्र बहुतांश ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.- प्रल्हाद हिरामणी,परीक्षा समन्वयक व तहसीलदार

टॅग्स :examपरीक्षा