शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मोबाइल जॅमर चाललेच नाहीत! यूपीएससी पूर्वपरीक्षा केंद्रांवरील प्रकार, १२ हजार ३७२ उमेदवार अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 05:53 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली.

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वपरीक्षांसाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर यंदा पहिल्यांदाच मोबाइल जॅमर लावण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी या मोबाइल जॅमरने कामच केले नाही, अशी माहिती परीक्षा केंद्रांवरील शिक्षकांनी दिली. त्याचवेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहोचण्यास थोडाही उशीर झाला तर त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यास आडकाठी करण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या.यूपीएससी पूर्वपरीक्षेत मोबाइलचा वापर करून गैरप्रकार करण्याचे काही प्रकार उजेडात आल्याने यंदा परीक्षा केंद्रांवर मोबाइल जॅमर बसविण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी हे मोबाइल जॅमर कार्यान्वितच झाले नाहीत. यामुळे यंदा तरी हा प्रयोग यशस्वी होऊ शकलेला नाही. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी एकीकडे नियमावर बोट ठेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरायचे आणि दुसरीकडे मोबाइल जॅमरसारख्या उपाययोजना मात्र फेल ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शहरातील ७४ परीक्षा केंद्रांवर यूपीएससीची पूर्वपरीक्षा पार पडली. पुणे शहरातून ३० हजार ४३० विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरला होता, मात्र १८ हजार ३०१ उमेदवारांनीच ही परीक्षा दिली. तब्बल १२ हजार १२९ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित राहिले. परीक्षेला अनुपस्थित राहण्याचे प्रमाण यंदा खूपच मोठे राहिले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी दोन तास अगोदर उपस्थित राहण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास पाच-दहा मिनिटे उशीर झाला तरी त्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे त्यांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळी ९.३० ते ११.३० आणि दुपारी (पान ५ वर)२.३० ते ४.३० अशी परीक्षेची वेळ होती.परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर ५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक उमेदवारांची तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंद्रात वेळेपूर्वी दोन तास अगोदर हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी धावपळ करावी लागली. त्याचबरोबर दोन पेपरच्या मध्येही खूप जास्तीचा गॅप ठेवण्यात आला होता. त्याचाही विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. एका विद्यार्थींनीला परीक्षा केंद्रात पोहचण्यास ५ मिनिटेच उशीर झाला होता, मात्र तिला प्रवेश दिला नाही अशी तक्रार तिने केली आहे.पहिलाच प्रयोगअसल्याने अडचणीपरीक्षा केंद्रावर पहिल्यांदाच मोबाइल जॅमर बसविण्यात येत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी पहिल्या सत्रात ते सुरू करता आले नाहीत. दुसºया सत्रात मात्र बहुतांश ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.- प्रल्हाद हिरामणी,परीक्षा समन्वयक व तहसीलदार

टॅग्स :examपरीक्षा