शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

Mini Lockdown In Baramati : बारामती तालुक्यात संचारबंदीचे नियम फाट्यावर; प्रशासनाचे दुर्लक्ष तर नागरिक संतप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:25 IST

विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या अधिक : ग्रामपंचायतीने कारवाई करण्याची गरज

सांगवी : एकीकडे कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी शासन कडक निर्बंध लागू करत आहे.मात्र दुसरीकडे काही मोठे व्यावसायिकच अणूपालन करत या निर्बंधाला धुडकावून लावत असल्याचे समोर आले आहे. सांगवी ( ता.बारामती ) येथे काही अपवाद वगळता छोटे व्यावसायिकच फक्त प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसून येत आहेत. 

मात्र गावातील काही हॉटेल, किराणा दुकाने व इतर बडे व्यावसायिकच संचारबंदीचे आदेश पायदळी तुडवत आहेत. यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. हातावर पोट असणारे व्यावसायिक प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे आपली दुकाने बंद करत आहेत. त्याचवेळी मोठे दुकानदार  विनामास्क वावरतात तसेच वेळेच्या  बंधनांचे पालन केले जात नाही. कुणाच्या पाठिंब्यावर बेधकपणे आपली दुकाने थाटून बसत आहेत.असा सवाल सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने देखील गावातील दुकानदारांवर वचक ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.

पुणे जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर सायंकाळी सहा वाजण्याच्या पुढे संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून प्रसारमाध्यमांतून जनजागृती देखील केली जात आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने माहिती दिल्यानंतर देखील छोटे व्यावसायिक संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करत आहेत.परंतू, काही मोठे व्यावसायिक आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणत दुकाने सहानंतर देखील बेधडकपणे सुरू ठेवत असल्याचे रविवारी आणि सोमवारी  निदर्शनास आले.

फलटण -बारामती रस्त्यावर व्यावसायिक सहा वाजल्यानंतर आपला पसारा आवरून घरी जात आहेत. मात्र, काही हॉटेल तसेच गावातील मुख्य बाजार पेठेतील बडे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करत आहे. फलटण रस्त्यावरील ६ नंतरही आपली दुकाने सुरूच ठेवत आहेत. यामुळे आता ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने अशा त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. 

 

 

 

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसgram panchayatग्राम पंचायत