शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

मेट्रोचा आज फैसला

By admin | Updated: March 7, 2015 00:13 IST

शहरातील मेट्रो भुयारी असावी की जमिनीवरून यामुळे निर्माण झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी महत्त्वाची बैठक होणार आहे.

पुणे : शहरातील मेट्रो भुयारी असावी की जमिनीवरून यामुळे निर्माण झालेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. भाजपाचे खासदार, काही आमदार व पालकमंत्री यांची याबाबत परस्परविरोधी भूमिका असून, मुख्यमंत्र्यांना यावर तोडगा काढून रखडलेला प्रकल्प मार्गी लावावा लागणार आहे.पुण्यानंतर नागपूर शहराकडून आलेल्या मेट्रोच्या प्रकल्पास मान्यता मिळून त्याचे भूमिपूजनही झाले. पुणे मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित असताना मेट्रो भुयारी व्हावी अशी मागणी स्वयंसेवी संस्थांकडून जोरदारपणे पुढे आली आहे. त्याला भाजपाचे खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी यांचा पाठिंबा आहे. महापालिकेने मंजूर करून केंद्राकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार मेट्रो व्हावी अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी घेतलेली आहे. मेट्रोसंदर्भात सविस्तर विचारविनिमय करण्यासाठी मंगळवारी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्त कुणाल कुमार हे या बैठकीला उपस्थित होते. याबाबत माहिती देताना कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘मेट्रोचा प्रकल्प मार्गी लागण्यातील अडचणी मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या जाणार आहेत. मंगळवारच्या बैठकीत केंद्राने दिलेल्या सूचनाही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.’’पुणे मेट्रोचा एकूण प्रकल्प दहा हजार कोटी रुपयांचा आहे. केंद्र शासनाने २०१५-१६ च्या अंदाजपत्रकामध्ये पुणे मेट्रोसाठी १२५ कोटींची तरतूद केली आहे, तर पुणे महापालिकेकडून २५ कोटी रुपये त्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्य शासनाचे अंदाजपत्रकही पुढील आठवड्यात सादर होणार आहे, त्यामध्ये पुणे मेट्रोला राज्य शासनाकडून किती निधी आवश्यक आहे. त्याबाबतच्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्याव्या लागणार आहेत. (प्रतिनिधी)स्वयंसेवी संस्थांना बैठकीचे निमंत्रणच नाही४शहरातील काही स्वयंसेवी संस्थांनी मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर अभ्यास करून, तो कमी खर्चात करता येणे शक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे मेट्रो भुयारीच असावी अशी मागणी त्यांनी जोरदारपणे पुढे केली आहे. ४त्याला काही लोकप्रतिनिधींनी पाठिंबाही दिला आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे उजेडात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मेधा कुलकर्णी या मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून स्वयंसेवी संस्थांना निमंत्रण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.