शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महिला साह्यता कक्षाकडे पुरुषांच्या तक्रार अर्जांत वाढ, ५९७ अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:41 IST

दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो.

- नम्रता फडणीसपुणे : दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो. मात्र, गुन्हा नोंदविण्यापूर्वी किंवा कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी समुपदेशनातून ही प्रकरणे सोडविण्यावर दिला जाणारा भर आणि जनजागृती या बाबींमुळे पोलीस आयुक्तालयातील महिला साह्यता कक्षाकडे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तक्रार अर्जांचे प्रमाण वाढले आहे. मागील दहा महिन्यांत कक्षाकडे १,९२० अर्ज दाखल झाले असून, यामध्ये पुरुषांच्या अर्जांचे प्रमाण अधिक आहे. परंतु, प्रत्येक अर्जाच्या चौकशीसाठी लागणारा कालावधी आणि त्यानंतर समुपदेशनासाठी होणारी ३ ते ४ सेशन्स यांमुळे जून ते आॅक्टोबरदरम्यान जवळपास ५९७ अर्ज कक्षाकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश वेळा घरांमधील व्यक्तीकडूनच महिलांना शारीरिक आणि मानसिक छळांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याअंतर्गत सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाºया छळाविरोधात महिलांना थेट पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची तरतूद असल्याने महिलांच्या तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येते. किरकोळ वादविवाद, मारहाण, विवाहबाह्य संबंध, विसंवाद तसेच एकमेकांकडून घटस्फोटाची मागणी अशा कारणांसाठी पोलीस ठाण्यांसह न्यायालयामध्ये अर्ज दाखल होत आहेत.मात्र, संसार मोडणे हा या कायद्याचा उद्देश नसल्याने पोलीस ठाणे आणि न्यायालयात अर्ज आल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविणे किंवा अर्जावर तत्काळ कारवाई केली जाण्याची प्रक्रिया केली जात नाही, तर सामोपचारातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. पोलीस ठाण्यांसह न्यायालयाकडे अर्ज आल्यानंतर ते अर्ज पोलीस आयुक्तालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर ते अर्ज महिला साह्यता कक्षाकडे वर्ग केले जातात. हे अर्ज मिळाल्यानंतर तक्रारदार महिलेसह कुटुंबीयाचेदेखील एकत्रितपणे समुपदेशन केले जाते.कायद्याचा दुरूपयोग : पुरूषांकडून तक्रार अर्जकित्येक वेळा महिलांकडून छोट्या-छोट्या कारणांसाठी कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असल्यामुळे पुरुषांकडूनही तक्रार अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी महिला साह्यता कक्षाकडे ३२८ पुरुषांचे अर्ज दाखल झाले होते. यंदाच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुरुषांच्या अर्जाचे प्रमाण ४२३ इतके आहे. महिला साह्यता कक्षाकडे दाखल झालेल्या १,९२० अर्जांपैकी १,३२५ अर्जांची निर्गती झाली असली तरी जून ते नोव्हेंबरदरम्यानचे जवळपास ५९५ अर्ज चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे.महिला साह्यता केंद्राकडे आलेल्या अर्जांची रीतसर पडताळणी आणि चौकशी करून मगच संबंधितव्यक्तींना दूरध्वनी करून समुपदेशनासाठी वेळ दिली जाते. मात्र, या समुपदेशनासाठी प्रत्येकी चार ते पाच सेशन्स होत असल्याने अर्जाच्या निर्गतीला काहीसा विलंब लागत आहे.- कल्पना जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,महिला साह्यता कक्ष

टॅग्स :Puneपुणे