शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महिला साह्यता कक्षाकडे पुरुषांच्या तक्रार अर्जांत वाढ, ५९७ अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:41 IST

दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो.

- नम्रता फडणीसपुणे : दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो. मात्र, गुन्हा नोंदविण्यापूर्वी किंवा कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी समुपदेशनातून ही प्रकरणे सोडविण्यावर दिला जाणारा भर आणि जनजागृती या बाबींमुळे पोलीस आयुक्तालयातील महिला साह्यता कक्षाकडे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तक्रार अर्जांचे प्रमाण वाढले आहे. मागील दहा महिन्यांत कक्षाकडे १,९२० अर्ज दाखल झाले असून, यामध्ये पुरुषांच्या अर्जांचे प्रमाण अधिक आहे. परंतु, प्रत्येक अर्जाच्या चौकशीसाठी लागणारा कालावधी आणि त्यानंतर समुपदेशनासाठी होणारी ३ ते ४ सेशन्स यांमुळे जून ते आॅक्टोबरदरम्यान जवळपास ५९७ अर्ज कक्षाकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश वेळा घरांमधील व्यक्तीकडूनच महिलांना शारीरिक आणि मानसिक छळांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याअंतर्गत सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाºया छळाविरोधात महिलांना थेट पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची तरतूद असल्याने महिलांच्या तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येते. किरकोळ वादविवाद, मारहाण, विवाहबाह्य संबंध, विसंवाद तसेच एकमेकांकडून घटस्फोटाची मागणी अशा कारणांसाठी पोलीस ठाण्यांसह न्यायालयामध्ये अर्ज दाखल होत आहेत.मात्र, संसार मोडणे हा या कायद्याचा उद्देश नसल्याने पोलीस ठाणे आणि न्यायालयात अर्ज आल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविणे किंवा अर्जावर तत्काळ कारवाई केली जाण्याची प्रक्रिया केली जात नाही, तर सामोपचारातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. पोलीस ठाण्यांसह न्यायालयाकडे अर्ज आल्यानंतर ते अर्ज पोलीस आयुक्तालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर ते अर्ज महिला साह्यता कक्षाकडे वर्ग केले जातात. हे अर्ज मिळाल्यानंतर तक्रारदार महिलेसह कुटुंबीयाचेदेखील एकत्रितपणे समुपदेशन केले जाते.कायद्याचा दुरूपयोग : पुरूषांकडून तक्रार अर्जकित्येक वेळा महिलांकडून छोट्या-छोट्या कारणांसाठी कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असल्यामुळे पुरुषांकडूनही तक्रार अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी महिला साह्यता कक्षाकडे ३२८ पुरुषांचे अर्ज दाखल झाले होते. यंदाच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुरुषांच्या अर्जाचे प्रमाण ४२३ इतके आहे. महिला साह्यता कक्षाकडे दाखल झालेल्या १,९२० अर्जांपैकी १,३२५ अर्जांची निर्गती झाली असली तरी जून ते नोव्हेंबरदरम्यानचे जवळपास ५९५ अर्ज चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे.महिला साह्यता केंद्राकडे आलेल्या अर्जांची रीतसर पडताळणी आणि चौकशी करून मगच संबंधितव्यक्तींना दूरध्वनी करून समुपदेशनासाठी वेळ दिली जाते. मात्र, या समुपदेशनासाठी प्रत्येकी चार ते पाच सेशन्स होत असल्याने अर्जाच्या निर्गतीला काहीसा विलंब लागत आहे.- कल्पना जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,महिला साह्यता कक्ष

टॅग्स :Puneपुणे