शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

पाणीप्रश्नावर १५ दिवसांत बैठक, आॅनलाइन तक्रारी करण्यासाठी विभागीय आयुक्तांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 02:39 IST

बाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नावर येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे. बाणेर-बालेवाडीच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते.

पुणे : बाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नावर येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहे.बाणेर-बालेवाडीच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी बैठकीचे आयोजन केले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या भागातील पाणीप्रश्नांबाबत आॅनलाइन तक्रारी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारी व प्रशासनाच्या पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी येत्या पंधरा दिवसांत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.बाणेर-बालेवाडी परिसरातील नागरिकांनी आपल्या पाणीप्रश्नाबाबत मंगळवारी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेतली. याबाबत न्यायालयाच्या आदेशानंतर देखील बाणेर-बालेवाडीचा पाणीप्रश्न सुटलेला नाही.यंदाचा संपूर्ण उन्हाळा तर खासगी टँकरकडून पाणी विकत घेऊनच नागरिकांनी काढला.महापालिकेकडून काही भागांत अत्यंत कमी दाबाने व केवळ एक-दोन तासच पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून, आणखी किती दिवस नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार, असे अनेक प्रश्न या वेळी उपस्थित केले. १५ दिवसांत महापालिका व संबंधित अन्य सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे.बाणेर-बालेवाडीच्या गेल्या दोन वर्षांतील तक्रारीबाणेर-बालेवाडीच्या पाणीप्रश्नाबाबत दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायालयाने ११ आॅक्टोबर २०१७ रोजी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासनाने ही समिती स्थापन केली असून, आतापर्यंत समितीच्या वतीने दोन बैठका घेण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी