शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

संमेलनस्थळ बडोदा, अमरावती की शिरूर? ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, श्याम मानव यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर उद्भवला वाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:38 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शुकदासमहाराज यांच्या विवेकानंद आश्रमाने संमेलनाचा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर, महामंडळ आता ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कोणत्या स्थळाचा विचार करणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पुणे : बुलडाणा जिल्ह्यातील शुकदासमहाराज यांच्या विवेकानंद आश्रमाने संमेलनाचा प्रस्ताव मागे घेतल्यानंतर, महामंडळ आता ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी कोणत्या स्थळाचा विचार करणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने साहित्य महामंडळाकडे नव्याने प्रस्ताव पाठवून संमेलन घेण्याची तयारी दाखवल्याने, आगामी संमेलन बडोद्याला होणार की शिरूरला किंवा अमरावतीची निवड होणार का? या चर्चांना वेग आला आहे.आगामी साहित्य संमेलनासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अमरावती, बडोद्यातील मराठी वाङ्ममय परिषद, नागपूरच्या कल्याण शिक्षण संस्थेकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी, बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा येथील विवेकानंद आश्रम, तसेच दिल्ली मराठी प्रतिष्ठान अशा सहा ठिकाणांहून महामंडळाकडे प्रस्ताव आले होते. त्यातील तीन शहरांचा विचार करून समितीने १९ आणि २० आॅगस्टला दिल्ली आणि बडोदा तर ९ सप्टेंबरला हिवरा येथील आश्रमाची पाहणी केली. दिल्ली मराठी प्रतिष्ठानने असमर्थता दर्शवल्यानंतर बडोदा आणि हिवरा यापैैकी हिवरा आश्रमाला समितीच्या सदस्यांनी पसंती देऊन तेथे साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी संमेलनस्थळाला आक्षेप नोंदवल्यानंतर मोठ्या प्रमाणात वादाला तोंड फुटले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कायम संस्थानिकांचेच बटिक असावे, असे अनेकांना वाटत असल्याची टिपण्णी करत पाठविलेला प्रस्ताव मागे घेत असल्याचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष रतनलाल मालपाणी यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.महामंडळाकडे नव्याने प्रस्ताव पाठवलामहामंडळाच्या स्थळ निवड समितीने शिरूर आणि अमरावतीला भेट देऊन पाहणी केली नव्हती. त्यामुळे गुरुवारी संध्याकाळी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने महामंडळाकडे नव्याने प्रस्ताव पाठवला आहे. प्रतिष्ठानने आगामी संमेलनाच्या यजमानपदाची तयारी दर्शवली असून, महामंडळाने या प्रस्तावाचा विचार करावा, असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे आगामी संमेलन बडोद्याला होणार की अमरावती अथवा शिरूरची निवड होणार, याबाबत चर्चांना वेग आला आहे.बुलडाण्यातून दुसरा प्रस्तावबुलडाण्यातच दुसºया ठिकाणी संमेलन व्हावे, यासाठी बुलडाण्याची विदर्भ साहित्य महामंडळाची शाखा प्रस्ताव पाठविणार आहे. बडोद्याचे नाव कायम आहेच; त्याशिवाय शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अमरावती, येथे संमेलन घ्यावे, असा प्रस्ताव परत नव्याने साहित्य महामंडळाकडे पाठविला आहे.अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार, अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी महामंडळाच्या अध्यक्षांकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसापकोणत्या पर्यायांचा विचार करायचा हे ठरवूहिवरा येथील विवेकानंद आश्रमाने संमेलनाचा प्रस्ताव मागे घेतला आहे. त्यानंतर शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे महामंडळाकडे नव्याने प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. संमेलनस्थळाचा अधिकार एकट्या अध्यक्षांकडे नसतो. त्यामुळे सर्व पदाधिकारी आणि घटक संस्थांशी चर्चा करून संमेलनस्थळासाठी कोणत्या पर्यायांचा विचार करायचा, हे ठरवले जाईल.- श्रीपाद जोशी, अध्यक्ष,अखिल भारतीय साहित्य महामंडळहिवरा आश्रम येथे काही कारणास्तव संमेलन होऊ शकले नाही; मात्र आम्ही जहाज सोडले नसून, जर महामंडळाने पुन्हा प्रस्ताव मागितला, तर बुलडाणा येथे संमेलन घेण्यासाठी प्रस्ताव पाठविणार आहोत. संमेलन बुलडाणा येथे यशस्वीपणे घेऊन दाखवू.- नरेंद्र लांजेवार,साहित्यिक बुलडाणादशकभरात दुसºयांदा संमेलनातून आयोजक संस्थेची माघारअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार, असे सूचित होताच त्यासंबंधातील वादांनाही तोंड फुटते आणि संमेलन संपेपर्यंत अनेक प्रकारचे वाद सुरूच राहतात.९१ व्या साहित्य संमेलनालाही सुरुवातीपासूनच वादाने घेरल्यामुळे संमेलन आणि वाद ही परंपरा कायम राहिली आहे. महामंडळाने शिक्कामोर्तब केल्यानंतर आयोजक संस्थेने संमेलनस्थळाचा प्रस्ताव मागे घेण्याची ही गेल्या दहा वर्षांतील दुसरी वेळ आहे. २०१२ मध्ये बडोदा वाङ्मय मंडळाने संमेलन आयोजित करण्याबाबत असमर्थता दर्शवली होती.महामंडळाने बुलडाणा जिल्ह्यातील विवेकानंद हिवरा आश्रमावर संमेलनासाठी शिक्कामोर्तब केल्यानंतर या निर्णयावर टिका होऊ लागली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी संमेलनस्थळाला विरोध केला. शुकदासमहाराजांच्या आश्रमावर झालेली टिकेनंतर हिवरा आश्रमाने संमेलनस्थळासाठी पाठवलेला प्रस्ताव मागे घेतला. यापूर्वीही २०१२ मध्ये निमंत्रकपदाचा मान मिळालेल्या संस्थेने आयोजनातून माघार घेतली होती.१९८८ साली अखिल भारतीय साहित्य संमेलन प्रवरानगरला घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यावेळी बाळासाहेब विखे-पाटील यांनी ‘त्या’ संमेलनासाठी आनंद यादव हेच अध्यक्ष हवेत, अशी जाहीरपणे मागणी केली होती. मात्र, ही भूमिका आम्हाला मान्य नाही, असे सांगत साहित्य महामंडळाने संमेलनस्थळ बदलले होते. ते संमेलन ठाण्याला आयोजित करण्यात आले. वसंत कानिटकर त्यावेळी अध्यक्ष होते. त्यामुळे वाद हा संमेलनाचा अविभाज्य भाग बनल्याचे मत साहित्य वर्तुळातून आणि सामान्यांमधून व्यक्त होत आहे.आर्थिक अडचणी व मनुष्यबळाचा अभावअखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे असताना २०१२ मध्ये बडोदा वाङ्मय मंडळाला साहित्य संमेलनाच्या निमंत्रकपदाचा बहुमान मिळाला होता.उषा तांबे या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा होत्या. त्यावेळी ८५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्याला होणार, हे निश्चित झाले होते.बृहन्महाराष्ट्रात साहित्य संमेलनाचा झेंडा फडकावा, हा यामागचा उद्देश होता. मात्र, संमेलन स्थळ जाहीर झाल्यानंतर आर्थिक अडचण आणि मनुष्यबळाचा अभाव यामुळे बडोदा येथील संस्थेने संमेलन आयोजित करण्याबाबत असमर्थता दर्शवली होती.बडोद्याने माघार घेतल्याने महामंडळाला संमेलनस्थळ बदलावे लागले होते. ८५ वे संमेलन महामंडळाने चंद्रपूर येथे आयोजित केले होते. ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी वसंत आबाजी डहाके हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.