शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पाणी कपातीच्या निर्णयासाठी आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:17 IST

महापालिकेचा आग्रह १३५० एमएलडीचा

पुणे : शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर मुंबईत सोमवारी (दि. २६) कालवा समितीची बैठक होत असून, त्यावर पुण्याला सध्या दिले जाते तेवढेच पाणी द्यायचे की त्यात कपात करून ते १ हजार १५० एमएलडी करायचे याचा निर्णय होणार आहे. महापौर मुक्ता टिळक या बैठकीसाठी जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या बैठकीत हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पुण्यातील आमदार, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी, बैठकीला उपस्थित असतील. पुणे शहराने दररोज १ हजार १५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे असा जलसंपदाने आग्रह धरला आहे. कालवा समितीच्या महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीतच तसा निर्णय झाला होता. त्याचा दाखला देत जलसंपदाने महापालिकेचा खडकवासला धरणातील पाणी उपसा करणारा पंपच बंद केला होता. २२ नोव्हेंबरला दुसऱ्या वेळी झालेल्या या कारवाईमुळे महापालिकेची भंबेरी उडाली. महापौर तसेच आयुक्त सौरभ राव यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना याबाबत माहिती दिली. बापट यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्याबरोबर बोलले, त्यामुळे त्याच रात्री लगेचच पंप सुरू झाला.

त्याच वेळेस बापट यांनी २६ नोव्हेंबरला मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महापौर तसेच आयुक्त व अन्य पदाधिकाºयांची बैठक घेण्याचे जाहीर केले. त्यात पुण्याच्या पाण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ती बैठक उद्या होत आहे. धरणातील पाण्याचे नियोजन करताना शेती तसेच ग्रामीण भागाचा विचार करूनच पुण्याला दररोज १ हजार १५० दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला असे जलसंपदाचे म्हणणे आहे. त्यामुळे ते महापालिकेने इतकेच पाणी घ्यावे याबाबत आग्रही आहेत. महापालिका मात्र सध्या आहे तितकेच म्हणजे १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी मिळावे यासाठी आग्रह धरत आहे. तेवढे पाणी मिळाले तरच संपूर्ण पुणे शहराला कसेबसे पाणी पुरवता येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.जलसंपदाकडून बिलाची मागणीजलसंपदाने महापालिकेकडे ७५ कोटी रुपयांची पाणीबिलाची मागणी केली आहे. त्यातील ३० कोटी रुपये महापालिका सोमवारीच अदा करणार आहे. त्यामुळे जलसंपदा आणखी काही दिवस १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेऊ देईल असे दिसते आहे. मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.सोमवारच्या बैठकीत यासंबंधी निर्णय होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. पाणी पुरवठ्यात कपात झाली तर पुणे शहराला सध्या आहे त्यापेक्षा कमी वेळ पाणीपुरवठा होईल. पाणीपुरवठा विभागाला त्याचे नव्याने वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. त्यातून पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा विभागातीलच काही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की ११५० दशलक्ष लिटर पाणी दररोज मिळाले तर कदाचीत पुढे ऐन उन्हाळ्यात दिवसाआड पाण्याची वेळही पुण्यावर येण्याची शक्यता आहे. धरणात पाणी असताना ते गरज नसताना शेतीसाठी सोडून जलसंपदा पुण्यावर अन्याय करत असल्याची शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटनांची भावना झाली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई