शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी कपातीच्या निर्णयासाठी आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:17 IST

महापालिकेचा आग्रह १३५० एमएलडीचा

पुणे : शहराच्या पाण्याच्या प्रश्नावर मुंबईत सोमवारी (दि. २६) कालवा समितीची बैठक होत असून, त्यावर पुण्याला सध्या दिले जाते तेवढेच पाणी द्यायचे की त्यात कपात करून ते १ हजार १५० एमएलडी करायचे याचा निर्णय होणार आहे. महापौर मुक्ता टिळक या बैठकीसाठी जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या बैठकीत हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पुण्यातील आमदार, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी, बैठकीला उपस्थित असतील. पुणे शहराने दररोज १ हजार १५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे असा जलसंपदाने आग्रह धरला आहे. कालवा समितीच्या महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीतच तसा निर्णय झाला होता. त्याचा दाखला देत जलसंपदाने महापालिकेचा खडकवासला धरणातील पाणी उपसा करणारा पंपच बंद केला होता. २२ नोव्हेंबरला दुसऱ्या वेळी झालेल्या या कारवाईमुळे महापालिकेची भंबेरी उडाली. महापौर तसेच आयुक्त सौरभ राव यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना याबाबत माहिती दिली. बापट यांनी जलसंपदामंत्री महाजन यांच्याबरोबर बोलले, त्यामुळे त्याच रात्री लगेचच पंप सुरू झाला.

त्याच वेळेस बापट यांनी २६ नोव्हेंबरला मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महापौर तसेच आयुक्त व अन्य पदाधिकाºयांची बैठक घेण्याचे जाहीर केले. त्यात पुण्याच्या पाण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ती बैठक उद्या होत आहे. धरणातील पाण्याचे नियोजन करताना शेती तसेच ग्रामीण भागाचा विचार करूनच पुण्याला दररोज १ हजार १५० दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय झाला असे जलसंपदाचे म्हणणे आहे. त्यामुळे ते महापालिकेने इतकेच पाणी घ्यावे याबाबत आग्रही आहेत. महापालिका मात्र सध्या आहे तितकेच म्हणजे १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी मिळावे यासाठी आग्रह धरत आहे. तेवढे पाणी मिळाले तरच संपूर्ण पुणे शहराला कसेबसे पाणी पुरवता येईल, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.जलसंपदाकडून बिलाची मागणीजलसंपदाने महापालिकेकडे ७५ कोटी रुपयांची पाणीबिलाची मागणी केली आहे. त्यातील ३० कोटी रुपये महापालिका सोमवारीच अदा करणार आहे. त्यामुळे जलसंपदा आणखी काही दिवस १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेऊ देईल असे दिसते आहे. मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची गरज आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.सोमवारच्या बैठकीत यासंबंधी निर्णय होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. पाणी पुरवठ्यात कपात झाली तर पुणे शहराला सध्या आहे त्यापेक्षा कमी वेळ पाणीपुरवठा होईल. पाणीपुरवठा विभागाला त्याचे नव्याने वेळापत्रक तयार करावे लागणार आहे. त्यातून पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा विभागातीलच काही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले, की ११५० दशलक्ष लिटर पाणी दररोज मिळाले तर कदाचीत पुढे ऐन उन्हाळ्यात दिवसाआड पाण्याची वेळही पुण्यावर येण्याची शक्यता आहे. धरणात पाणी असताना ते गरज नसताना शेतीसाठी सोडून जलसंपदा पुण्यावर अन्याय करत असल्याची शहरातील स्वयंसेवी संस्था, संघटनांची भावना झाली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई