शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

माऊलींची पालखी दर्शनबारीतच उतरणार

By admin | Updated: July 4, 2015 00:01 IST

माऊलींची पालखी दर्शनबारीतच उतरविण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. मात्र, तेथे काही अघटित घडले तर त्याची जबाबदारी ते घेणार का, असा सवालही होत आहे.

बापू बैैलकर, पुणेमाऊलींची पालखी दर्शनबारीतच उतरविण्याचा निर्णय देवस्थान प्रशासनाने घेतला आहे. मात्र, तेथे काही अघटित घडले तर त्याची जबाबदारी ते घेणार का, असा सवालही होत आहे. तेथे गर्दीमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या दर्शनबारीत याचे नियोजनच केले नसल्याने हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सोहळ्याला अवघे सहा दिवस राहिले असताना हा प्रश्न आहेच.आळंदी देवस्थानच्या वतीने सुमारे पाच कोटी रुपये खर्चून वारकऱ्यांच्या सोयीसाठी पूर्वीच्या गांधीवाड्याच्या ठिकाणी दर्शनबारी उभी राहिली आहे. या ठिकाणी यापूर्वी आजोळघरी पालखी आल्यानंतर पूजेची प्रथा आहे. येथे पालखी उतरवली जायची. मात्र नवीन बांधकामात पालखीसाठीच्या नियोजनाचाच विसर देवस्थानला पडला गेला. देवस्थानतर्फे दर्शनबारीत प्रवेशद्वारावर कट्टा बांधून मोकळ्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे. मागे हॉलमध्ये दिंड्या व पूजाअर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र तेथे जर पालखी उतरवली तर अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत पावसाळा सुरू आहे. शिवाय पालखीचे प्रस्थान रात्रीच्या वेळी ९ वाजता होणार आहे. आजोळघरी पालखीची पूजा, त्यानंतर महानैवेद्य, समाज आरती, रात्रीचा जागर असे प्रमुख कार्यक्रम याच ठिकाणी होतात, अशा वेळी वारकरी, दिंडीकरी, इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. त्यामुळे त्या अपुऱ्या जागेत चेंगराचेंगरी होण्याचा धोका संभवतो. त्यात जर या कालावधीत मोठा पाऊस आला तर वारकरी दर्शनबारीत घुसू शकतात. अजून दर्शनबारीचे काम अपूर्ण आहे. या कामाच्या सक्षमतेचा दाखलाही अजून देवस्थान प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे इमारतीलाही धोका संभवू शकतो. पालखीबरोबर साधारण दीड ते दोन हजार भाविक असतात. त्यात दर्शनासाठीही वारकरी शिरकाव करू शकतात. यामुळे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दर्शनबारीतील मधला जिना काढायचा हा एक कायमस्वरूपी पर्याय समोर आला आहे. मात्र त्या बांधकामाची रचना करताना हा जिना करण्यात आला आहे. आरसीसी बांधकाम असल्याने जर तो हलवला तर बांधकामालाही धोका संभवू शकतो. पालखी सोहळा सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. खेडचे प्रांताधिकारी हिंमतराव खराडे यांच्याशी संपर्क साधला असता, देवस्थान, विश्वस्त, मालक व चोपदार यांच्याशी चर्चा झाली असून, पालखी तेथेच उतरवायचा त्यांचा निर्णय झाला आहे. ती कुठे उतरावयाची हा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. मात्र त्यांना प्रशासनाचे लागणारे सर्व सहकार्य करू. मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक औंधकर म्हणाले, की प्रशासनाचे त्यांना पूर्ण सहकार्य राहील. मात्र, तेथे बांधकाम चालू आहे. आम्हाला बांधकाम सक्षमतेसाठी कोणीही मागणी केली नाही. त्यामुळे तेथे पालखी उतरल्यास जे प्रश्न निर्माण होतील, याबाबत बोलू शकत नाही. हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जेथे पालखी उतरवायची ते विचार करताहेत ती जागा अपुरी पडणार आहे. जर तेथे कोणता अघटित प्रकार घडला तर देवस्थान त्याची जबाबदारी घेणार का? असा सवाल करीत परंपरा मोडू नये ही माझी माफक अपेक्षा आहे. उद्या पालखी दुसरीकडे उतरली तर तोच पायंडा पडेल. या लोकांना दर्शनबारी करताना माऊलींचा विसरच पडला कसा? - बाळासाहेब आरफळकर, मालक दर्शनबारीत पालखीचे नियोजन न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. १0- १५ दिवसांपूर्वी हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हा पेच सुटला आहे. त्यामुळे आता काहीच अडचण नाही. पालखी येथे उतरवणे ही परंपरा आहे. वारकऱ्यांची येथे श्रद्धा आहे. त्यामुळे दुसरा पर्याय योग्य नाही. येथेच सर्वांनी नियोजन करून व प्रशासनाने मदत करून सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मदत केली पाहिजे.अवधूत गांधी, गांधीवाड्याचे मालक