शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

मशेरी सुदृढ बाळासाठी घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:52 IST

मशेरी तसेच तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अन्य महिलांच्या तुलनेत चार पटीने जास्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

पुणे : मशेरी तसेच तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अन्य महिलांच्या तुलनेत चार पटीने जास्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. तंबाखूचा वापर करणाºया महिलांच्या नवजात शिशूंचे वजनही तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये अल्प उत्पन्न गटातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाअंतर्गत डॉ. हेमलता शेडगे यांनी हे संशोधन केले आहे. त्या सध्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सीटीयू विभागात कार्यक्रम व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत.‘तंबाखूच्या वापराने गर्भवती महिलांवर होणार परिणाम’ या विषयावर त्यांनी मागील महिन्यात शोधप्रबंध सादर केला आहे. त्यासाठी त्यांनी २०१४-१५ या वर्षात अभ्यास केला. मशेरी हा प्रकार महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांकडून मशेरीचा वापर जास्त केला जातो, असे जागतिक तंबाखू सर्वेक्षणामध्ये नोंदविण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर मानवशास्त्र विभागामधील प्रा. शौनक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभ्यासात शेडगे यांनी तंबाखूचावापर न करणाºया महिलांच्यातुलनेत तंबाखूचा वापर करणाºया महिलांचे वजन कमी असल्याचे दाखवून दिले आहे. तसेचउच्चशिक्षित महिलांच्या तुलनेमध्ये अशिक्षित महिलांना अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता ९ पटीने अधिक आढळली.>शिशूंचे वजन तुलनात्मकदृष्ट्या कमीअभ्यासासाठी पुण्यामधील दोन सरकारी व दोन खासगी रुग्णालयांमधील ५९१ महिलांची निवड करण्यात आली होती. या महिलांपैकी १४० म्हणजेच २३.६९ टक्के महिलांच्या नवजात शिशूंचे वजन कमी आढळले. या अभ्यासामध्ये तंबाखूचा वापर करणाºया महिलांच्या नवजात शिशूंचे वजनही तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळले.अशा महिलांच्या भुकेवर, त्यांच्या गरोदरपणातील वजनवाढीवर तंबाखूचा परिणाम होत असावा, अशी ठळक शक्यता या अभ्यासांती व्यक्त करण्यात आली आहे. तंबाखू हा एक विषजन्य घटक आहे.जगभरात मृत्यूस कारणीभूत असणाºया दहा मुख्य आजारांपैकी आठ आजारांमागे तंबाखूचे सेवन हे एक मुख्य कारण असू शकते, असे सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे. शहरातील चार रुग्णालयांमधील ५९१ महिलांपैकी १९१ महिला मशेरीच्या आहारी केल्याचे आढळून आले. या महिला अल्प उत्पन्न गटातील असून घरकाम करणाºया किंवा गृहिणी आहेत. मशेरी किंवा तंबाखूमुळे भुकेवर परिणाम होऊन जेवण कमी जाते. त्यामुळे गर्भवती असताना आवश्यक पोषक आहार मिळत नाही. परिणामी अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढते. या महिलांना डॉक्टरांनी कधीही त्यांच्या सवयीबद्दल विचारले नाही. त्यामुळे त्यांची ही सवय कमी झाली नसल्याचे दिसून आले.- डॉ. हेमलता शेडगे, संशोधक