शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

"हिमाचलमध्ये जमीन घेऊ शकत नाही, मग आम्ही का मोकळीक दिली"; मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 19:54 IST

Raj Thackeray: पुण्यात झालेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली. तीन दिवसीय मराठी विश्व साहित्य संमेलनात विविध मान्यवरांनी ...

Raj Thackeray: पुण्यात झालेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली. तीन दिवसीय मराठी विश्व साहित्य संमेलनात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून मराठी भाषेविषयी आपली मतं व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याचा शेवट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं म्हटलं. त्यासह विकासाच्या नावाखाली जमिनींच्या विक्रीवरुन राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

"कलाकारांना पुरस्कार मिळतात, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तो तिरस्कार घेऊन आम्हाला वाटचाल करावी लागते आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे जग त्यानंतरच तुम्हाला दाद देतात. बाकीची राज्ये स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलायला जातो. आपल्याकडची मुलं मुली एकमेकांना भेटल्यावर हिंदीमध्ये बोलतात कशासाठी. या हिंद प्रातांवर सव्वाशे वर्षे मराठ्यांनी राज्य केलं आहे. मराठी भाषेसाठी उदय सामंत यांनी जी लागेल ती मदत करु असं सांगितले आहे. पण जी गोष्ट आम्ही करू त्यात तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. तेव्हा फक्ते केसेस टाकू नका," असं राज ठाकरे म्हणाले.

"मी जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय. मराठी माणसांचं जे अस्तित्व आपल्या शहरांमध्ये असायला हवं आणि दिसायला हवं त्यासाठी राज्य सरकारने आणि आपण सगळ्यांनी मिळून ते टिकवले पाहिजे. प्रगतीच्या नावावरती नुसत्या जमिनी जाणार असतील आणि आमचीच लोकं बेघर होणार असतील त्याला विकास असं म्हणत नाही. आपलं अस्तित्व पुसण्याचा एक प्रकारचा तो डाव असतो. कलम ३७० काश्मीर मधून रद्द झालं. त्याचा अर्थ काय तर भारतीय माणूस तिथे स्वतःची जमीन घेऊ शकतो. अजून किती जणांनी जमीन घेतली मला माहिती नाही. खरंतर पहिल्यांदा अदानी आणि अंबानी यांनी घेतली पाहिजे. त्यानंतरच लोकांना विश्वास बसेल की तिथे जायला हरकत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.

"हे फक्त काश्मीर पुरतं मर्यादित नाही. तुम्ही जर हिमाचल प्रदेशमध्ये गेलात तर तिथे तुम्ही जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही आसाम, मणिपूर यासारख्या भागात गेलात तर जमीन विकत घेऊ शकत नाही भारतीय असून सुद्धा. मग आम्हीच काही मोकळी दिली आहे. तुम्ही या आणि आमची जमीन घेऊन जा. हा जो प्रकार आहे यामुळे तुमचं अस्तित्व टिकलं नाही मग भाषा कुठून टिकेल. तुम्ही असाल तरच भाषा टिकेल. मराठी माणसाबरोबर मराठी माणसाचं अस्तित्व देखील राज्य सरकारने टिकवलं पाहिजे," असंही आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेmarathiमराठी