शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"हिमाचलमध्ये जमीन घेऊ शकत नाही, मग आम्ही का मोकळीक दिली"; मराठीच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 19:54 IST

Raj Thackeray: पुण्यात झालेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली. तीन दिवसीय मराठी विश्व साहित्य संमेलनात विविध मान्यवरांनी ...

Raj Thackeray: पुण्यात झालेल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली. तीन दिवसीय मराठी विश्व साहित्य संमेलनात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून मराठी भाषेविषयी आपली मतं व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्याचा शेवट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित झाला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत असं म्हटलं. त्यासह विकासाच्या नावाखाली जमिनींच्या विक्रीवरुन राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

"कलाकारांना पुरस्कार मिळतात, पण आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो. तो तिरस्कार घेऊन आम्हाला वाटचाल करावी लागते आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे जग त्यानंतरच तुम्हाला दाद देतात. बाकीची राज्ये स्वतःच्या भाषेबद्दल अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेत का बोलायला जातो. आपल्याकडची मुलं मुली एकमेकांना भेटल्यावर हिंदीमध्ये बोलतात कशासाठी. या हिंद प्रातांवर सव्वाशे वर्षे मराठ्यांनी राज्य केलं आहे. मराठी भाषेसाठी उदय सामंत यांनी जी लागेल ती मदत करु असं सांगितले आहे. पण जी गोष्ट आम्ही करू त्यात तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. तेव्हा फक्ते केसेस टाकू नका," असं राज ठाकरे म्हणाले.

"मी जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय. मराठी माणसांचं जे अस्तित्व आपल्या शहरांमध्ये असायला हवं आणि दिसायला हवं त्यासाठी राज्य सरकारने आणि आपण सगळ्यांनी मिळून ते टिकवले पाहिजे. प्रगतीच्या नावावरती नुसत्या जमिनी जाणार असतील आणि आमचीच लोकं बेघर होणार असतील त्याला विकास असं म्हणत नाही. आपलं अस्तित्व पुसण्याचा एक प्रकारचा तो डाव असतो. कलम ३७० काश्मीर मधून रद्द झालं. त्याचा अर्थ काय तर भारतीय माणूस तिथे स्वतःची जमीन घेऊ शकतो. अजून किती जणांनी जमीन घेतली मला माहिती नाही. खरंतर पहिल्यांदा अदानी आणि अंबानी यांनी घेतली पाहिजे. त्यानंतरच लोकांना विश्वास बसेल की तिथे जायला हरकत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.

"हे फक्त काश्मीर पुरतं मर्यादित नाही. तुम्ही जर हिमाचल प्रदेशमध्ये गेलात तर तिथे तुम्ही जमिनीचा तुकडा विकत घेऊ शकत नाही. तुम्ही आसाम, मणिपूर यासारख्या भागात गेलात तर जमीन विकत घेऊ शकत नाही भारतीय असून सुद्धा. मग आम्हीच काही मोकळी दिली आहे. तुम्ही या आणि आमची जमीन घेऊन जा. हा जो प्रकार आहे यामुळे तुमचं अस्तित्व टिकलं नाही मग भाषा कुठून टिकेल. तुम्ही असाल तरच भाषा टिकेल. मराठी माणसाबरोबर मराठी माणसाचं अस्तित्व देखील राज्य सरकारने टिकवलं पाहिजे," असंही आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेmarathiमराठी