शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

हक्कांच्या मागण्यांसाठी मराठा मोर्चा; बैठकीत निर्वाळा

By admin | Updated: September 14, 2016 00:59 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रक्ताचे शिंपण करून क्रांती घडविलेल्या या समाजावर पिढ्यान्पिढ्या अन्याय-अत्याचार होत असून

जेजुरी : छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रक्ताचे शिंपण करून क्रांती घडविलेल्या या समाजावर पिढ्यान्पिढ्या अन्याय-अत्याचार होत असून, गावगाड्यातील अठरापगड जातींना बरोबर घेऊन वाटचाल करणारा मराठा समाज सध्याच्या काळात मागे पडला आहे, अशी विविध मते मराठा समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मांडत आता अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.येत्या २५ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून जेजुरी येथील छत्रीमंदिर येथे सोमवारी (दि. १२) शहर पंचक्रोशी व ग्रामीण भागातील मराठा समाजबांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठा समाजातील वकील, इंजिनिअर, उद्योजक, व्यापारी व्यावसायिक, प्राध्यापक, शेतकरी, आजी-माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेषत: युवकवर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोपर्डी घटनेचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. मराठा समाजाचा लढा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून न्याय्य आणि हक्कांच्या मागणीसाठी आणि संघटित होण्यासाठी आहे. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या १०० पैकी ९० केसेस खोट्या आहेत, असे मत बैठकीत व्यक्त झाले.सध्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. त्यांना कर्जमाफी मिळावी, अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील युवकांना आरक्षण नसल्याने तो बेरोजगार होत आहे. आरक्षण मिळण्यासाठी गांभीर्याने विचार व्हावा. समाजाला सध्या कोणी वाली नाही. सत्तेत आपले लोक असूनही काही घटक आर्थिकदृष्ट्या मागास आणि दुर्बल राहिल्याची खंत आहे अशी विविध मते व मागण्या उपस्थितांनी मांडल्या. २५ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या मूक मोर्चात सहभागी होण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना या वेळी करण्यात आल्या. कोपर्डी घटनेतील निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पोलीस ठाण्यात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)