शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

हक्कांच्या मागण्यांसाठी मराठा मोर्चा; बैठकीत निर्वाळा

By admin | Updated: September 14, 2016 00:59 IST

छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रक्ताचे शिंपण करून क्रांती घडविलेल्या या समाजावर पिढ्यान्पिढ्या अन्याय-अत्याचार होत असून

जेजुरी : छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे. आपल्या रक्ताचे शिंपण करून क्रांती घडविलेल्या या समाजावर पिढ्यान्पिढ्या अन्याय-अत्याचार होत असून, गावगाड्यातील अठरापगड जातींना बरोबर घेऊन वाटचाल करणारा मराठा समाज सध्याच्या काळात मागे पडला आहे, अशी विविध मते मराठा समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मांडत आता अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.येत्या २५ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होण्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून जेजुरी येथील छत्रीमंदिर येथे सोमवारी (दि. १२) शहर पंचक्रोशी व ग्रामीण भागातील मराठा समाजबांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मराठा समाजातील वकील, इंजिनिअर, उद्योजक, व्यापारी व्यावसायिक, प्राध्यापक, शेतकरी, आजी-माजी नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विशेषत: युवकवर्ग व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कोपर्डी घटनेचा निषेध करीत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. मराठा समाजाचा लढा कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नसून न्याय्य आणि हक्कांच्या मागणीसाठी आणि संघटित होण्यासाठी आहे. अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात बदल करण्याची गरज आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या १०० पैकी ९० केसेस खोट्या आहेत, असे मत बैठकीत व्यक्त झाले.सध्या शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. त्यांना कर्जमाफी मिळावी, अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, शिक्षणामध्ये व नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील युवकांना आरक्षण नसल्याने तो बेरोजगार होत आहे. आरक्षण मिळण्यासाठी गांभीर्याने विचार व्हावा. समाजाला सध्या कोणी वाली नाही. सत्तेत आपले लोक असूनही काही घटक आर्थिकदृष्ट्या मागास आणि दुर्बल राहिल्याची खंत आहे अशी विविध मते व मागण्या उपस्थितांनी मांडल्या. २५ सप्टेंबरला पुणे येथे होणाऱ्या मूक मोर्चात सहभागी होण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना या वेळी करण्यात आल्या. कोपर्डी घटनेतील निर्भयाला श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पोलीस ठाण्यात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)