शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
2
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
3
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
4
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
5
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
6
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
7
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
8
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
9
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
10
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
11
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
12
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
13
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
14
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
15
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
16
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
17
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
18
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
19
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
20
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ला बँकांचा कोलदांडा, स्वच्छतागृहाअभावी ग्राहकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 03:25 IST

केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चही केला आहे. बँकांच्या माध्यमातून या निधीचे लाभार्थ्यांना वाटप केले. याच बँकांकडून या अभियानाला कोलदांडा देण्यात येत आहे. देशभरातील बँकांमध्ये ग्राहकांसाठी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे विविध कामांनिमित्त बँकेत आलेल्या ग्राहकांची कुचंबणा होत आहे.

- नारायण बडगुजरपिंपरी - केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चही केला आहे. बँकांच्या माध्यमातून या निधीचे लाभार्थ्यांना वाटप केले. याच बँकांकडून या अभियानाला कोलदांडा देण्यात येत आहे. देशभरातील बँकांमध्ये ग्राहकांसाठी स्वच्छतागृह नाही. त्यामुळे विविध कामांनिमित्त बँकेत आलेल्या ग्राहकांची कुचंबणा होत आहे.केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाची रक्कम बँकांच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होते. हगणदरीमुक्त भारत अर्थात ‘स्वच्छ भारत’ अभियान मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदानही देण्यात येत आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर शौचालयासाठी अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. याचाच अर्थ असा की, संबंधित बँका आणि यंत्रणा या अभियानाचाच एक भाग आहेत. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे अभियान देशभर राबविणे शक्य आहे. मात्र, देशभरातील शासकीय आणि राष्ट्रीयीकृत बँका याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.बँकांच्या कार्यालयात शाखाधिकारी, रोखपाल, लिपिक, सहायक यांसह कर्जवितरण अधिकारी, वसुली अधिकारी आदी कर्मचाऱ्यांचा समावेश असतो.या सर्वांसाठी संबंधित कार्यालयात स्वच्छतागृह असते; मात्र त्याचा वापर ग्राहकांना करता येत नाही. बँकेच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी केलेली बैठक व्यवस्थात्यासाठीचे काऊंटर आणि फर्निचर आदी व्यवस्था त्याला कारणीभूत असते.‘नागरिकांची सनद’नुसारनाही सेवाबँकेत येणाºया प्रत्येक ग्राहकाला अपेक्षित सेवा देण्यासाठी नियमावली तयार केली आहे. रिझर्र्व्ह बँकेने तयार केलेली ही नियमावली देशातील सर्व बँकांना लागू आहे.सिटीझन चार्टर अर्थात नागरिकांची सनद म्हणून ही नियमावली ओळखली जाते. किती मिनिटांत रोकड अदा करावी, रोकड जमा करावी किंवा अन्यसेवेसाठी किती कालावधी लागेल आदीबाबत या सनदेत उल्लेख आहे. त्यानुसार बँकांनी सेवा पुरविणे आवश्यक आहे. मात्र त्यानुसार बँकांचे कामकाज होत नाही.स्टेट बँक आॅफ इंडियातर्फे सुविधास्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखांमध्ये ग्राहकांसाठीही स्वच्छतागृह खुले असल्याचे काही ठिकाणी दिसून येते. स्टेट बँकेने त्यासाठी सर्व शाखांना तसे सूचनापत्र दिले असल्याचे सांगण्यात येते. इतर बँका मात्र याबाबत उदासीन असल्याचे दिसून येते.देशभरात १९ राष्ट्रीयीकृत बँकाअलाहाबाद बँक, आंध्र बँक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडीकेट बँक, युको बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, युनायटेड बँक आॅफ इंडिया, विजया बँक या देशातील राष्ट्रीयीकृत बँका आहेत. स्टेट बँकदेखील शासकीय बँक आहे. आयडीबीआय ही बँकही भारत सरकारचा उपक्रम आहे; मात्र सार्वजनिक क्षेत्रातील इतर वित्तीय बँकांमध्ये आयडीबीआय बँकेचा समावेश होतो.बँकांच्या परिसरात दुर्गंधीबँकांमध्ये मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यामुळे किरकोळ कामांसाठीही ग्राहकांना अर्धा ते दोन तास प्रतीक्षा करावी लागते. अशा वेळी शौचास किंवा लघुशंकेसाठी स्वच्छतागृह नसल्याने संबंधित ग्राहकांची कुचंबणा होते. ग्राहकांना नाईलाजास्तव बँकेच्या बाहेर उघड्यावर लघुशंका करावी लागते. परिणामी बँकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते. 

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान