शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मनरेगा योजना म्हणजे भिकारी तयार करण्याचा कारखाना : तुषार गांधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 17:41 IST

मनरेगासारख्या शासकीय योजनांव्दारे ग्रामीण जनतेच्या स्वाभिमानास ठेच पोहचविली जात आहे.

ठळक मुद्देराष्ट्रपुरूषांमुळेच लोकशाहीचा पाया मजबूत ग्रामीण जनतेने धाडस आणि धारिष्ट्य गमावलेले

पुणे:- महात्मा गांधींनी खेड्यांच्या स्वावलंबनावर भर दिला होता. परंतु, खेड्यांना स्वावलंबनाकडे नेण्याऐवजी मनरेगासारख्या शासकीय योजनांव्दारे ग्रामीण जनतेच्या स्वाभिमानास ठेच पोहचविली जात आहे. योजनेचे वर्णन करावयाचे झाल्यास भिकारी तयार करण्याचा कारखाना एवढीच होऊ शकेल, अशा शब्दात महात्मा गांधी यांचे पणतू आणि ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी मनरेगा योजनेवरच ताशेरे ओढले. वक्तृवोत्तेजक सभेच्या सहकार्याने साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेचे 'सद्य परिस्थिती आणि महात्मा गांधी' या विषयावरील पहिले पुष्प गांधी यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष रविंद्र माळवदकर, कार्याध्यक्ष भाई कात्रे, आतिक सय्यद, अन्वर राजन आदी मान्यवर उपस्थित होते.  गांधी म्हणाले, ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण सक्षमीकरणाऐवजी त्यांना ऐतखाऊ आणि आळशी बनविले जात आहे. त्यांच्या पंखांना ताकद देण्याएवजी त्यांना लाचार केले जात आहे. आज एकरांमध्ये जमीन असलेले शेतकरी, सुशिक्षित तरुण देखील मनरेगा आणि इतर सरकारी योजनांव्दारे मिळणा-या मानधनात समाधान मानत आहेत. त्या योजनांमध्ये काम करताना मिळणा-या मानधनाबाबत ते पूर्ण मिळावे याबाबत ते आग्रही नसतात. ठरलेल्या मानधनापेक्षा ठेकेदाराने कमिशनपोटी काही रक्कम कापून घेतल्यास त्यास विरोध करण्याचे धाडस आणि धारिष्ट्य देखील ग्रामीण जनता गमावून बसली आहे. भ्रष्टाचाराची अशा प्रकारची मुकसंमती किंवा स्वीकृती निंदनीय आहे. जनता देखील त्यांच्या स्वार्थार्पोटी अशा गोष्टी खपवून घेते सांभाळून घेते. अशा पद्धतीने जनतेची मानसिकता झाल्यास बापूंच्या स्वप्नातील किंवा त्यांना अभिप्रेत असलेल्या भारताची आपण निर्मिती करु शकू का? असा प्रश्न गांधी यांनी उपस्थित केला. कार्याध्यक्ष भाई कात्रे यांनी आभार मानले. ------------------------------------------------------------राष्ट्रपुरूषांमुळेच लोकशाहीचा पाया मजबूत स्वातंत्र्यानंतर भारताने काय प्रगती केली असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्यावर टीका करताना ते म्हणाले, इतक्या वर्षात जणू काही प्रगतीच झालेली नाही. ते न होण्याला पंडित जवाहरलाल नेहरुंना जबाबदार ठरवले जाते, हे चुकीचे आहे. नेहरु, डॉ. आंबेडकर या राष्ट्रपुरुषांनी भारतीय घटनेचा पाया मजबूत केला. आज भारतात लोकशाही व्यवस्था आस्तित्वात असण्याचे श्रेय या राष्ट्रपुरुषांनी मजबूत बांधलेल्या पायाला द्यावे लागेल.नाहीतर पाकिस्तान सारखे लष्कराच्या हातात नियंत्रण गेले असते. राष्ट्रपुरुषांचे हे योगदान असले तरी केवळ त्यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले नसून तत्कालीन जागृक जनता जर्नादनच्या त्यागामुळे मिळाले. आज प्रजा आणि नेतृत्व त्यांच्या त्यांच्या स्वार्थार्पोटी राष्ट्रभक्तीला तिलांजली देत असल्याचा आरोप त्यांनी केला. ............'मर्यादपुरुषोत्तम' या रामाच्या बिरुदाला साजेसे वर्तन करावे. जी तत्वे आणि शुद्ध आचार-विचारांनी भारत ओळखला जायचा ती तत्वे आणि आचार-विचारांनी जगणारे राजकारणी आणि जनता राहिली आहे का हा प्रत्येकाने स्वत:ला विचारण्याजोगा प्रश्न आहे. बापूंना ज्या प्रकारचे रामराज्य अपेक्षित होते त्याच्या अगदी विरुद्ध आपली वाटचाल सुरु आहे. ज्या रामाचे नाव घेऊन सरकार सत्तेत आले, त्यांनी तरी 'मर्यादपुरुषोत्तोम' या रामाच्या बिरुदाला साजेसे वर्तन करावे. आज कर्नाटकातील सत्ता मिळविण्यासाठी ज्या प्रकारे घोडेबाजाराला चालना, उत्तेजन दिले गेले, हे उघड्या डोळ्यांनी जनता पाहत राहिली, अशा शब्दात त्यांनी जनतेलाही खडे बोल सुनावले.

टॅग्स :Puneपुणे