शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पुणे विद्यापीठाचेही व्यवस्थापन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 05:17 IST

मुंबई पाठोपाठ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे देखील व्यवस्थापन कोलमडले आहे.

दीपक जाधव।पुणे : मुंबई पाठोपाठ आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागाचे देखील व्यवस्थापन कोलमडले आहे. व्यवस्थापन शाखेत (एमबीए) प्रथम वर्षाला शिकणाºया विद्यार्थ्यांचा निकाल आॅनलाइन जाहीर होऊन वर्ष उलटले तरी अद्याप एकाही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यात आलेली नाही. गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्यच धोक्यात आले आहे.इंजिनिअरींग व आर्किटेक्ट कॉलेजचे विद्यार्थी परीक्षेला हजर असतानाही त्यांना गैरहजर दाखवून अनुत्तीर्ण करण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच उजेडात आला होता. त्यापाठोपाठ एमबीच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका न देण्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.या विद्यापीठाच्या अंतर्गत १९१ व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालये आहेत. एमबीए प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राचा निकाल नोव्हेंबर २०१६ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला. त्यानंतर अद्यापही त्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आलेले नाही. एमबीएच्या दुसºया सत्र परीक्षेचा निकाल मे २०१७ मध्ये आॅनलाइन जाहीर करण्यात आला, त्याचीही गुणपत्रिका अद्याप देण्यात आलेली नाही.एमबीएच्या खासगी महाविद्यालयांचे शुल्क लाखांच्या घरात आहे. अनेक विद्यार्थी शैक्षणिक कर्ज घेऊन एमबीएचे शिक्षणघेत आहेत. त्यांना दरवर्षी बँकांकडे त्यांच्या गुणपत्रिका जमा कराव्या लागतात. वेळेवर गुणपत्रिका जमा न केल्यास त्यांना पुढील वर्षाचे शैक्षणिक कर्ज दिले जात नाही. आॅनलाइन निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना वर्ष झाले तरी गुणपत्रिका मिळाल्या नाहीत यावर विश्वास ठेवायला बँका तयार नाहीत.>परीक्षा विभागप्रमुख नॉट रिचेबलएक वर्षापासून गुणपत्रिका मिळाली नसल्याबाबत परीक्षा विभागाचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्याकडे महाविद्यालय प्रशासनाने संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवी उत्तरे दिली.एकाही महाविद्यालयास अद्यापही गुणपत्रिका का मिळाल्या नाहीत, याचे उत्तर त्यांनी दिले नाही. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.