शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाट बनला धोकादायक

By admin | Updated: October 27, 2015 00:44 IST

नगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील नगर, ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला माळशेज घाट अत्यंत अवघड व धोकादायक झाला आहे

मढ : नगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ वरील नगर, ठाणे, पुणे या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला माळशेज घाट अत्यंत अवघड व धोकादायक झाला आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवासी व वाहनचालकांनी केली आहे. अहमदनगर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांबरोबरच विदर्भ व मराठवाड्यातून मुंबई, कल्याण, ठाणे, भिवंडी, वाशी, नवी मुंबई या भागात जाण्यासाठी हा मार्ग सर्वांत जवळचा व तुलनेने सुरक्षित आहे. वेळ, इंधन व पैसा वाचत असल्याने प्रवासी या मार्गावरून जातात. उन्हाळ्यात डोंगरकडे मोठ्या प्रमाणावर तापतात व पावसाळ्यात या तापलेल्या कड्यांवर पाणी पडले असता ते तडकून मुख्य डोंगरापासून तुटून रस्त्यावर कोसळतात.घाटातील बोगदा ते कल्याण बाजूकडील शेवटचे वळण या अंतरातील डोंगरकडे धोकादायक झाले आहे. त्यांची उंची ही मोठी आहे. ते केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याचे घाटातून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवासी व वाहनचालकांनी सांगितले. धोकादायक असणारे कडे ताबडतोब काढून टाकणे आवश्यक आहे. प्रसंगी काही कड्यांना पुणे-मुंबई मार्गावरील खंडाळा घाटातील कडे ज्याप्रमाणे तोडण्यात आले तसे पाहणी करून घाटातील धोकादायक डोंगरकडे तोडून घाट सुरक्षित करावा, तसेच आवश्यक तेथे लोखंडी जाळी बसवावी.घाटात रस्ता अतिशय अरुंद व एकेरी मार्गाचा आहे. एका बाजूला उंचच उंच डोंगर व दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यास डोंगरकड्याला वाहन धडकून अथवा खोल दरीत कोसळून भीषण अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करतात. पावसाळ्यात दाट धुके व पावसामुळे माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात अरुंद रस्ता व धोकादायक कड्याच्या दुरुस्तीचे काम करता येत नाही. परंतु, आता पाहणी करून माळशेज घाटात धोकादायक डोंगरकडे तोडून काढता येऊ शकतात व संभाव्य धोका टळू शकतो. तरी, माळशेज घाटातील धोकादायक ठिकाणाची, डोंगरकड्यांची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी व प्रवासी व वाहनचालकांना भयमुक्त प्रवास करण्यास मदत करावी. (वार्ताहर)