शहरं
Join us  
Trending Stories
1
हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
3
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
4
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
5
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
6
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
7
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
8
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
9
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
10
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
11
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
12
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
13
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
16
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
17
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
18
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
19
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
20
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग

माळीणकरांचा गुढीपाडवा यंदाही जुन्या घरातच?

By admin | Updated: March 23, 2017 04:13 IST

डोंगरचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत रक्ताच्या अनेक नात्यांना मुकलेल्या व तीन वर्षांपासून उन्हा-पावसात पत्र्याच्या घरांमध्ये

पुणे : डोंगरचा कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत रक्ताच्या अनेक नात्यांना मुकलेल्या व तीन वर्षांपासून उन्हा-पावसात पत्र्याच्या घरांमध्ये हालअपेष्टा सोसलेल्या माळीणकरांचा यंदाचा गुढीपाडवा आपल्या हक्कांच्या नवीन घरांमध्ये साजरा होणार अशी अपेक्षा होती. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या गावांचा लोकार्पण सोहळा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अथक परिश्रम घेऊन पुनवर्सित गावांची सर्व कामे पूर्ण करून सज्ज देखील केले. परंतु सध्या अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्र्यासह अन्य सर्वंच मंत्र्यांच्या तारखा मिळत नसल्याने दुर्घटनाग्रस्त माळीणकरांना नवीन घरे तयार होऊन देखील पत्र्यांच्या घरातच गुढी पाडवा साजरा करावा लागणार आहे.आंबेगाव तालुक्यात साह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या माळीण गावावर तीन वर्षांपूर्वी ३० जुलै रोजी झालेल्या धुव्वाधार पावसामुळे डोंगराचा कडा कोसळून संपूर्ण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत शेकडो लोकांना आपले प्राण गमवले तर गावातील बहुतेक सर्व घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली केली. यामुळे संपूर्ण गावाचे अस्तित्वच नष्ट झाले. परंतु शासनानाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने प्रामुख्याने जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा अत्यंत देखणे पुनवर्सित माळीण गाव उभे केले. जिल्हा प्रशासनने माळीण गावाच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी संपूर्ण गावांचा व पायभूत सुविधांचा आराखडा तयार करून आवश्यक असलेली जमिन खरेदी करण्यात आली. यामध्ये सुरुवातील निधी मिळण्यासाठी प्रशासनाला शासन दरबारी अनेक हेलपाटे मारावे लागले. त्यानंतर शासन, जिल्हा प्रशासन, विविध समाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिक यांच्या मदतीने आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या ६७ घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. याशिवाय शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, अंगणवाडी केंद्र, संरक्षण भिंत अशा सुमारे १८ पायभूत सुविधांनी सज्ज असे अत्यंत देखणे पुनर्वसित माळीण गाव उभे राहिले आहे. नवीन वर्षांची सुरुवात गुढी पाडव्यानेचे होते, तसेच कोणत्याही चांगला गोष्टींचा शुभारंभ या दिवशी केली जाते. त्यामुळे माळीणकरांना त्यांची सर्व दुख: विसरून एका चांगल्या मुहूर्तावर नवीन घरांमध्ये प्रवेश करण्यासाठी ही चांगली संधी होती. परंतु माळीणच्या लोकार्पण सोहळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी २ एप्रिल ही तारीख दिल्याने गुढी पाडवा जुन्याच घरात होणार आहे.