शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

‘माळेगाव’चे कर्ज अखेर मंजूर

By admin | Updated: September 25, 2015 01:18 IST

बँक प्रतिनिधी नियुक्तीवरून माळेगाव सहकारी साखर कारखान्याला नाकारलेले कर्ज अखेर जिल्हा बँकेने आज मागणीप्रमाणे मंजूर केले.

बारामती : बँक प्रतिनिधी नियुक्तीवरून माळेगाव सहकारी साखर कारखान्याला नाकारलेले कर्ज अखेर जिल्हा बँकेने आज मागणीप्रमाणे मंजूर केले. कारखान्याची आर्थिक कोंडी करण्याचे राजकारण केले जात असल्याची टीका सर्वच स्तरांतून झाली. जिल्हा बँकेने कर्ज नाकारल्यामुळे अन्य बँकांकडून कर्ज घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पुणे जिल्हा बँकेने कर्ज नाकारल्याचे कळविल्यानंतर ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, अध्यक्ष रंजन तावरे यांनी राज्य सहकारी बँकेसह अन्य जिल्हा बँकांकडे कर्जाची मागणी केली. राज्य सहकारी बँकेने कर्जाला मंजुरी दिली. तर अन्य एका जिल्हा सहकारी बँकेने कर्ज मंजूर केले होते. त्याची माहिती पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच कार्यकारी संचालकांमार्फत कर्ज मंजूर केल्याचे सांगण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, यापूर्वी कर्ज नाकारल्याचे पत्र देण्यात आले होते. आज जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून एफआरपीसाठी २४.५ कोटी आणि पूर्व हंगामासाठी १५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचे सांगितले. सभासदांच्या खात्यावर २८ तारखेच्या अगोदर एफआरपीची रक्कम जमा होईल.कारखान्यावरील सत्ता बदलानंतर जिल्हा बँकेचा प्रतिनिधी नियुक्त करा, अन्यथा माळेगाव सहकारी साखर कारखान्याला आर्थिक सहकार्य होणार नाही, अशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका घेतली होती. जिल्हा बँकेचा प्रतिनिधी नियुक्त करणे बेकायदेशीर ठरेल. नव्या घटनादुरुस्ती व पोट नियमातील बदलानुसार बँक व शासनाचा प्रतिनिधी नियुक्ती बेकायदेशीर ठरणार आहे, असे असताना बँकेचा प्रतिनिधी घ्याच, अशी भूमिका घेऊन बँकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत माळेगाव वगळता अन्य कारखान्यांच्या कर्जाला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटले होते. ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी बँकेमार्फत कारखान्याच्या सभासदांची आर्थिक कोंडी केली जात आहे, अशी टीका केली होती. त्याचबरोबर कर्ज नाकारल्याची बाब माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या देखील निदर्शनास राज्य साखर संघाच्या कार्यक्रमात रंजन तावरे यांनी आणून दिली. ३० सप्टेंबरच्या अगोदर एफआरपीची रक्कम देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर येत्या हंगामासाठी खेळते भांडवलासाठी जिल्हा बँकेकडे अनुक्रमे २४ आणि १४ कोटींची मागणी करण्यात आली होती.