शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:10 IST

नारायणगाव : ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करा, राजधर्माचे पालन करा, एक रुपयाचा देखील गैरकारभार करू नका, भ्रष्टाचाराचा कलंक लागल्यास गावपातळीवर ...

नारायणगाव : ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक करा, राजधर्माचे पालन करा, एक रुपयाचा देखील गैरकारभार करू नका, भ्रष्टाचाराचा कलंक लागल्यास गावपातळीवर आणि पुढील पाच पिढ्यांची मानहानी होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

वारूळवाडी ग्रामपंचायतीने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या आणि पुणे जिल्ह्यातील अद्ययावत अशा ग्रामसंसद या इमारतीची पाहणी करून आयुष प्रसाद यांनी समाधान व्यक्त केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, दिलीप गांजाळे, नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, संजय वारुळे, आशिष फुलसुंदर, विपुल फुलसुंदर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य जंगल कोल्हे, आत्माराम संते, देवेंद्र बनकर, ज्योती संते, सतेज भुजबळ आदी उपस्थित होते.

आयुष प्रसाद यांनी नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे यांचा सत्कार करून सत्ताधा-यांना पारदर्शक कारभार करण्याचा सल्ला देऊन विरोधी गटातील सदस्यांना विश्वासात घेऊन राजधर्माचे पालन करावे, अशी सूचना केली. पुढील पाच वर्षांत आदर्श अशी ग्रामपंचायत करून नागरिकांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून द्यावे, परिसर विकासासाठी औद्योगिक धोरणाचा अवलंब करावा असाही सल्ला प्रसाद यांनी मार्गदर्शन करताना दिला.

२३ नारायणगाव

राजेंद्र मेहेर यांचा सत्कार करताना आयुष प्रसाद.