शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिरासाठी संसदेत कायदा करा - प्रवीण तोगडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:34 IST

राममंदिराचा प्रश्न उपस्थित करू नये म्हणून सत्तेत असलेल्या लोकांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

पुणे : अयोध्येतील राममंदिराबाबत हिंदंूनी बाळगलेली सहनशीलता आता संपत चालली असून, केंद्र शासनाने त्वरित संसदेमध्ये कायदा करून राममंदिराची उभारणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्टÑीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सोमवारी केली. तसेच राममंदिराचा प्रश्न उपस्थित करू नये म्हणून सत्तेत असलेल्या लोकांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.तोगडिया सोमवारी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ४ वर्षांत राममंदिरचा प्रश्न मार्गी लावला नाही, त्याचाच परिणाम म्हणून उत्तर प्रदेशच्या गोरखपूर आणि फुलपूर येथील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला. आता हिंदूंची सहनशीलता संपत चालली आहे. यापुढे कोणताही बहाणा चालणार नाही’’ असे तोगडिया यांनी स्पष्ट केले.राममंदिराचा प्रश्न उपस्थित करू नये यासाठी सत्तेत बसलेल्या लोकांकडून दबाव टाकला जातआहे, मात्र हा दबाव कोणाकडून टाकला जातोय ते वेळ आल्यावरच स्पष्ट करू, असे तोगडिया यांनी सांगितले.तोगडिया म्हणाले, ‘‘गेल्या ३२ वर्षांपासून अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी आंदोलन करीत आहे. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यावर राममंदिर उभारण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालय केवळ जमिनीच्या मालकीहक्काबद्दल निवाडा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राममंदिर उभारण्यासाठीकेवळ ११०० चौरस मीटरचा भूखंड मिळेल. उर्वरित ६७ एकर जागा मशिदीला दिली जाईल अशी भीती वाटते आहे.’’

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरpraveen togadiaप्रवीण तोगडिया