शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘मायलेकरा’च्या अमूर्त नात्याला मिळाले शब्दरुपी कोंदण!; पुणेकरांनी अनुभवला उत्कट भावानुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:58 IST

रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले.

ठळक मुद्दे‘मायलेकरं’ मधून येत गेले ‘काळ बदलला तरी काळीज बदलत नाही’, याचे प्रत्यंतर रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : सृष्टीच्या चराचरातील निर्मितीचा प्रत्यय देणारं नातं म्हणजे ‘मायलेकरं’! उत्कटता, आर्तता, व्याकुळता अशा भावनांचा अनोखा मिलाफ...अमूर्त नात्याला शब्दरुपाने मिळालेले मूर्त कोंदण... कविता, कथांमधून पाझरलेला वात्सल्याचा झरा... असा उत्कट भावानुभव उपस्थितांनी गुरुवारी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले आणि ‘काळ बदलला तरी काळीज बदलत नाही’, याचे प्रत्यंतर ‘मायलेकरं’ मधून येत गेले.रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे निवेदन, निवड आणि गुंफण डॉ. अरुणा ढेरे यांची होती. ढेरे यांच्यासह वीणा देव, गिरीश ओक आणि आशुतोष जावडेकर यांनी अभिवाचन केले. अनुराधा मराठे यांचे सुरेल गीतात्म सादरीकरणाने कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला.‘निज रे निज छंद ताला रे, नंदलाला रे’ ही अंगाई, आचार्य अत्रे यांचे ‘दिनूचे बिल’ ही कथा, शांता शेळके यांची ‘आई म्हणजे तव्यावरची गरम पोळी’, ‘सकाळी कमी जेवलो तर आईला कसे कळते’ अशा कवितांमधून आईशी बाळाची जुळलेली नाळ कशा प्रकारे अधिकाधिक घट्ट होत जाते, याची अनुभूती आली. ‘जोपर्यंत आईच्या मुठीत आपलं बोट असतं, तोवर बालपण शाबूत असतं. मात्र, बोट सुटल्यावर आधाराची खरी जाणीव होते’, अशा रसपूर्ण निवेदनातून डॉ. अरुणा ढेरे यांनी नात्याचे विविध पदर उलगडून दाखवले. संजीवनी मराठे यांच्या ‘बरं का गं आई’ या कवितेतून आईची आई होण्याचा चिमुरडीचा प्रवास, फ्रँक कॉकनर यांच्या कथेतून आईला इतर कोणाशीही शेअर न करण्याचा चिमुकल्याचा बालहट्ट, गौरी देशपांडे यांच्या ‘मिमी आणि आई’ या कथेतून आई आणि लेकीमधला लटका राग आणि त्यामागील काळजी अशा भावनांच्या हिंदोळयांवर उपस्थितांनी सैर केली. इंदिरा संत यांच्या ‘घरातला मोठा मुलगा’ या कवितेतून मुलांचे वाढते वय, आई आणि मुलांमधील तुटत चाललेला संवादाचा पूल, पद्मा गोळे यांच्या ‘आईपणाची भीती’ या कवितेतून आईला वाटणारी आधुनिक जगाची भीती, अगतिकता, शोभा डे यांनी मुलांना लिहिलेले पत्र, नीलिमा माणगावे यांच्या कवितेतून अनुभवायला मिळालेलं अदभूत वळणावर येऊन ठेपणारं मायलेकीचं नातं, बहिणाबाई चौधरी यांची ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ तर अरुणा ढेरे यांची ‘पोर जन्मा आली तेव्हा, बाप म्हणाला कचरा, मीच म्हणाले असू द्या माझ्या जीवाला आसरा’ अशा एकाहून एक सरस कवितांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.

टॅग्स :Puneपुणे