शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

‘मायलेकरा’च्या अमूर्त नात्याला मिळाले शब्दरुपी कोंदण!; पुणेकरांनी अनुभवला उत्कट भावानुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:58 IST

रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले.

ठळक मुद्दे‘मायलेकरं’ मधून येत गेले ‘काळ बदलला तरी काळीज बदलत नाही’, याचे प्रत्यंतर रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : सृष्टीच्या चराचरातील निर्मितीचा प्रत्यय देणारं नातं म्हणजे ‘मायलेकरं’! उत्कटता, आर्तता, व्याकुळता अशा भावनांचा अनोखा मिलाफ...अमूर्त नात्याला शब्दरुपाने मिळालेले मूर्त कोंदण... कविता, कथांमधून पाझरलेला वात्सल्याचा झरा... असा उत्कट भावानुभव उपस्थितांनी गुरुवारी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले आणि ‘काळ बदलला तरी काळीज बदलत नाही’, याचे प्रत्यंतर ‘मायलेकरं’ मधून येत गेले.रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे निवेदन, निवड आणि गुंफण डॉ. अरुणा ढेरे यांची होती. ढेरे यांच्यासह वीणा देव, गिरीश ओक आणि आशुतोष जावडेकर यांनी अभिवाचन केले. अनुराधा मराठे यांचे सुरेल गीतात्म सादरीकरणाने कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला.‘निज रे निज छंद ताला रे, नंदलाला रे’ ही अंगाई, आचार्य अत्रे यांचे ‘दिनूचे बिल’ ही कथा, शांता शेळके यांची ‘आई म्हणजे तव्यावरची गरम पोळी’, ‘सकाळी कमी जेवलो तर आईला कसे कळते’ अशा कवितांमधून आईशी बाळाची जुळलेली नाळ कशा प्रकारे अधिकाधिक घट्ट होत जाते, याची अनुभूती आली. ‘जोपर्यंत आईच्या मुठीत आपलं बोट असतं, तोवर बालपण शाबूत असतं. मात्र, बोट सुटल्यावर आधाराची खरी जाणीव होते’, अशा रसपूर्ण निवेदनातून डॉ. अरुणा ढेरे यांनी नात्याचे विविध पदर उलगडून दाखवले. संजीवनी मराठे यांच्या ‘बरं का गं आई’ या कवितेतून आईची आई होण्याचा चिमुरडीचा प्रवास, फ्रँक कॉकनर यांच्या कथेतून आईला इतर कोणाशीही शेअर न करण्याचा चिमुकल्याचा बालहट्ट, गौरी देशपांडे यांच्या ‘मिमी आणि आई’ या कथेतून आई आणि लेकीमधला लटका राग आणि त्यामागील काळजी अशा भावनांच्या हिंदोळयांवर उपस्थितांनी सैर केली. इंदिरा संत यांच्या ‘घरातला मोठा मुलगा’ या कवितेतून मुलांचे वाढते वय, आई आणि मुलांमधील तुटत चाललेला संवादाचा पूल, पद्मा गोळे यांच्या ‘आईपणाची भीती’ या कवितेतून आईला वाटणारी आधुनिक जगाची भीती, अगतिकता, शोभा डे यांनी मुलांना लिहिलेले पत्र, नीलिमा माणगावे यांच्या कवितेतून अनुभवायला मिळालेलं अदभूत वळणावर येऊन ठेपणारं मायलेकीचं नातं, बहिणाबाई चौधरी यांची ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ तर अरुणा ढेरे यांची ‘पोर जन्मा आली तेव्हा, बाप म्हणाला कचरा, मीच म्हणाले असू द्या माझ्या जीवाला आसरा’ अशा एकाहून एक सरस कवितांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.

टॅग्स :Puneपुणे