शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरशी जुळणार महाराष्ट्राचे ‘रक्ताचे नाते’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:53 IST

काश्मीरमध्ये आपले भारतीय जवान संरक्षणासाठी रक्त सांडतात. म्हणून आपण सुरक्षित आहोत; पण या जवानांसाठी काश्मीरमध्ये रक्तासाठी दात्यांची वाट पाहावी लागते;

- श्रीकिशन काळे पुणे : काश्मीरमध्ये आपले भारतीय जवान संरक्षणासाठी रक्त सांडतात. म्हणून आपण सुरक्षित आहोत; पण या जवानांसाठी काश्मीरमध्ये रक्तासाठी दात्यांची वाट पाहावी लागते; पण आता तेथे रक्त देण्यासाठी पुणे व महाराष्ट्रातून दात्यांची टीम जात आहे. खरं तर काश्मीर येथील जवानांसाठी पुण्यातून अनेक वर्षांपासून विविध प्रकारची मदत पुरविली जात आहे; पण आता पुण्याचे काश्मीरशी रक्ताचे नाते जुळणार आहे. तेथील लोकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी पुण्यातील ‘रक्ताचे नाते’ या संस्थेचे कार्यकर्ते तेथे जाऊन रक्तदान करणार आहेत.काश्मीरमध्ये जवानांसाठी खूप रक्तलागते; परंतु तिथे तेवढे मिळत नाही. त्यामुळे तेथील लोकांना एक संदेश मिळावा म्हणून हे शिबिर श्रीनगर येथे घेण्यात येत आहे. त्यासाठी दोन-तीन महिन्यांपासून तयारी केली जात आहे. महाराष्ट्रातून २४, पंजाबमधून २० आणि इतर राज्यांमधून ३५ जण यामध्ये सहभागी होत आहेत. हे सर्व जण ‘रक्ताचे नाते’ या ट्रस्ट सोबत जोडलेले आहेत. विमानाने जाणार आहेत. कारण, रेल्वेने जाण्या-येण्यातच दोनचार दिवस जातात. म्हणून विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.याबाबत रक्ताचे नाते या संस्थेचे संस्थापक राम बांगड म्हणाले की, मी स्वत: गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान करीत आहे. राज्यात व देशात रक्तदाते एकत्र केले आहेत. काश्मीरमध्ये काही जण काम करीत आहेत. त्यांचा आम्ही पुण्यात सन्मान केला होता. त्यांनी तेव्हा आम्हाला सांगितले की, तिकडे रक्त खूप लागते; पण लोकांमध्ये त्याबाबत जागरूकता नाही. तेव्हा आम्ही तेथे जाऊन रक्तदान करण्याचे ठरविले.पुण्यातील लोकं काश्मीरमध्ये येऊन रक्तदान करीत आहेत. मग आपण का करत नाही, अशी भावना त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी आम्ही तिकडे जाण्याचे नियोजन केले. मी स्वत: तिथे रक्तदान आणि मार्गदर्शन करणार आहे. माझे १२४ वे रक्तदान असणार आहे. यापूर्वी अशा प्रकारे काश्मीरमध्ये जाऊन कोणी रक्तदान केलेले नाही. त्यामुळे हा एक वेगळा उपक्रम ठरणार आहे. श्रीनगरमध्ये चाइल्ड एज्युकेशन सोसायटी सर्व सोय करीत आहे.श्रीनगरच्या जिल्हा रुग्णालयात हे रक्तदान होणार आहे. या अनोख्या उपक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या की, नागरिकांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागविण्यासाठी हा खूप चांगला उपक्रम आहे.>काश्मीरमध्ये रक्तदात्यांची वानवाकाश्मीरमध्ये रक्तदान करणारे लोक नाहीत. त्यामुळे तिथे नेहमी गरज लागते. जवानाला किंवा नागरिकाला रक्त लागत असेल, तर एखाद्या ट्रस्टच्या कार्यकर्त्याला बोलावले जाते; पण कोणी पुढे येत नाही.त्यामुळे तेथील सामान्य नागरिकांमध्ये जागरूकतावाढावी, यासाठी आम्ही हाउपक्रम घेत आहोत. आम्ही सर्व जात आहोत. आमच्यात सर्वजणपदवीधर आणि इंजिनिअर आहेत. अनेक लोकआताही तयार होत आहेत; पण आता विमानाचे तिकीट लगेच काढले तर खूप महाग पडते. त्यामुळे अनेकजणांना येता येणार नाही, असे राम बांगड म्हणाले.