शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

आसामची दुर्मीळ कासवं विमानाने पुण्यातून निघाली आपल्या गावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 07:49 IST

पुण्यातून झाली रवाना; तस्करी करताना केली होती जप्त

पुणे : तस्करीमध्ये सापडलेली कासवं आता आपल्या हक्काच्या घरी जाण्यासाठी पुण्यातून थेट विमानाने गुरुवारी रवाना झाली. दुर्मीळ असणारी ही कासवं पुण्यातून लखनऊच्या रेस्क्यू सेंटरमध्ये जात असून, तिथे काही दिवस वातावरणाशी एकरूप झाले की, आसाममधील गुवाहाटीला त्यांचं शेवटचं ‘डेस्टिनेशन’ असणार आहे.वन विभागाला  २५ मे रोजी चेन्नईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये हे प्राणी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाने कासवं, इग्वाना आणि फायटर मासे जप्त केली होती.  हे सर्व प्राणी बावधन येथील क्यू रेस्क्यू सेंटरमध्ये योग्य वातावरणात देखरेखीखाली ठेवली होती. या वेळी मुख्य वन संरक्षक सुजय दोडल, क्यू रेस्क्यू टीमच्या संचालक नेहा पंचमिया आदी उपस्थित होते. इंडियन हरपेटॉलॉजिकल सोसायटीकडे ५५ दुर्मीळ कासवे होती, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टकडे ८ होती, अशी एकूण ६३ कासवे विमानाने त्यांच्या गावाकडे रवाना झाली.  ‘कासवांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी  विमानाने पाठविण्याची ही घटना प्रथमच महाराष्ट्रात वन विभागाकडून होत आहे. आज पुण्यातून ही कासवं गुवाहाटीला जात असून, तिथे आसामची वन्यजीव टीम त्यांना ताब्यात घेईल.’ - राहुल पाटील, उपवनसंरक्षक प्रत्येकाचा एक अधिवास असतो. त्याच ठिकाणी ते चांगल्याप्रकारे जगू शकतात. आपल्याकडे ही कासवं निसर्गात जगू शकली नसती, ती आपल्याकडे कैद असल्यासारखी राहिली असती. म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या गावी पाठवत आहोत. - विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक