शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Election 2019 : भावनाशील मुद्दे जुन्नरमध्ये प्रभावी ठरणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:13 IST

तिरंगी लढत : नेत्यांच्या सभा, असंतुष्टांचे समाधान यावरही निकालाचे भवितव्य 

विकास चाटी - जुन्नर विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळी भावनाशीलता हा मुद्दा प्रभावी ठरला होता. तसाच तो यंदाही ठरणार आहे. विकासाचे मुद्दे, कामाचा श्रेयवाद, असंतुष्टांचे समाधान हेही कळीचे मुद्दे ठरणार आहेत.  जुन्नरमध्ये गेल्या वेळी शिवसेनेच्या आशा बुचके व मनसेचे शरद सोनवणे यांच्यात सामना रंगला होता. सोनवणे पूर्वीही शिवसेनेत होते. दोन वेळा त्यांना उमेदवारी डावलून बुचके यांना दिल्याने सोनवणेंवर अन्याय होत असल्याची भावना मतदारांमध्ये होती. दशक्रिया विधी, गुणवंतांचे सत्कार असे सामाजिक उपक्रम राबविल्यामुळे जनतेची सहानुभूती मिळून सोनवणे सुमारे १७ हजार मताधिक्याने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात असलेल्या नाराजीचा फायदाही त्यांना झाला होता. यंदा मात्र त्यांच्याविरोधात जनभावना निर्माण करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल बेनके यांना बरेच यश मिळाले आहे. सतत चार वर्षे पुढे असलेले सोनवणे गेल्या काही महिन्यांत प्रभाव कायम ठेवण्यात कमी पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी दुष्काळात धरणांचे पाणी नियोजन करण्यात सोनवणे कमी पडल्याची भावना विरोधकांनी शेतकºयांमध्ये निर्माण केली आहे. भरीस भर शिवसेनेच्या रणरागिणी अशी ओळख आशा बुचके यांना शिवसेनेतून काढण्यामागे सोनवणेच जबाबदार असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण करण्यात बुचके यशस्वी ठरत आहेत. सोनवणेंचा सेनेत प्रवेश जुन्या शिवसैनिकांबरोबरच भाजप कार्यकर्त्यांना पटलेला नाही. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सोनवणे यांनी शिवसेनेचे उमेदवार पाडल्याचा राग जुन्या शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळे शिवसेनेची हक्काची मते सोनवणे यांना किती मिळतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. दीड वर्षापूर्वी चाळकवाडी टोलनाका बंद करण्याच्या आंदोलनात बेनके सोनवणे यांच्यापेक्षा प्रभावी ठरले. सोनवणे यांना विधानसभा अधिवेशन अर्धवट सोडून अचानक टोलनाका बंद करण्यासाठी यावे लागले........पवार व कोल्हे फॅक्टर  बेनके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार प्रथमच जुन्नरमध्ये आल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा जुन्नर हा मूळ तालुका आहे. कोल्हेंबद्दल तरुणांमध्ये क्रेझ आहे. शिवाजीराव आढळराव जिंकायचे तेव्हा त्यांना तालुक्यातून २० हजारांपर्यंत मताधिक्य मिळत असे. खासदार कोल्हे यांना सुमारे ४१ हजारांचे मताधिक्य मिळाले यातून हे दिसून येते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कोल्हे यांची सभा ठेवली आहे, त्याचा कितपत प्रभाव पडतो हे महत्त्वाचे ठरणार आहे........ 

टॅग्स :Junnarजुन्नरjunnar-acजुन्नरPoliticsराजकारणElectionनिवडणूक