शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

मदनवाडी तलाव कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 23:26 IST

सिद्धेश्वर निंबोडीसह परिसरातील गावे तहानलेली : खडकवासल्याचे आवर्तन सोडण्याची मागणी

पारवडी : सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) येथील बारामती, इंदापूर या तालुक्यांना वरदान ठरलेला मदनवाडी तलाव आठ महिन्यांपासून कोरडाच आहे. परिणामी, सिद्धेश्वर निंबोडीसह परिसरातील गावे ऐन पावसाळ्यातही तहानलेलीच आहेत. त्यामुळे या भागाला पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी करावी लागत आहे.

सन १९७२मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळात प्रशासनाने १७० हेक्टर क्षेत्रावर हा तलाव बांधला. तलावात पावसाबरोबरच पारवडीमधून वाहणारे ओढे तसेच खडकवासला कालव्याचे आवर्तन यांमुळे पाणीसाठी होतो. वितरिका ३६ तसेच ४० यांच्या साह्याने खडकावासला कालव्यातून पाणी सोडले जाते. आवश्यक पाणीसाठा झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील मदनवाडी, वीरवाडी, सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन तसेच वितरिकेच्या माध्यमातून पाणी देण्यात येते. परंतु, चार वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा तसेच खडकवासला कालव्याचे आवर्तन वेळोवेळी न मिळाल्याने सध्या हा तलाव कोरडा ठणठणीतच राहिला आहे. आठ दिवसांत खडकवासल्यातून पाणी न सोडल्यास गाव सोडून जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईचार वर्षांपासून मदनवाडी तलाव कोरडाच आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसांत पंचायत समितीच्या माध्यमातून पाण्याचा टँकर मागविणार आहे. तसेच, पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी ग्रामसभा घेऊन बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील तसेच खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना खडकवासला कालव्याचे आवर्तन सोडण्याबाबत लेखी निवेदन दिले आहे.- मनीषा फडतरे, सरपंच, सिद्धेश्वर निंबोडीमदनवाडी तलावाच्या आधारावर गेली कित्येक वर्षे शेतीव्यवसाय करीत होतो; परंतु तलावातील पाणीसाठ्याच्या अनियमितपणामुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. तीन वर्षांपासून बारामती औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरातील खासगी कारखान्यात कामाला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावर जावे लागते. येत्या आठ दिवसांत तलावात खडकवासला कालव्याचे आवर्तन सोडून आवश्यक पाणीसाठा न केल्यास ग्रामस्थांना गाव सोडून जावे लागेल.- शरद सवाणे,ग्रामस्थ, सिद्धेश्वर निंबोडीमदनवाडी तलावात आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करून देण्याबाबत सिद्धेश्वर निंबोडी ग्रामपंचायत कार्यालयाकडून निवेदन आलेले आहे. त्यांचा संबंधित विभागाशी बोलणे तसेच पाठपुरावा केला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात खडकवासला कालव्याचे आवर्तन मिळण्याच्या दृष्टीने निर्णय होईल.-हनुमंत पाटील, तहसलीदार, बारामती तालुका

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती