शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

उचली अभावी साखर पडून

By admin | Updated: July 3, 2016 03:50 IST

साखरेला सध्या चांगले दिवस आले आहेत. साखरेच्या दरात १५ ते २० रुपयांची दरवाढ सुरूच आहे. मात्र, नुसते कागदोपत्री दर वाढलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र व्यापाऱ्यांकडून साखरेची

सोमेश्वरनगर : साखरेला सध्या चांगले दिवस आले आहेत. साखरेच्या दरात १५ ते २० रुपयांची दरवाढ सुरूच आहे. मात्र, नुसते कागदोपत्री दर वाढलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र व्यापाऱ्यांकडून साखरेची उचलच केली जात नसल्याचे पुढे आले आहे. पुढील साखर हंगाम सुरू होण्यासाठी अवघे तीन महिने उरलेले आहेत. मात्र, गेल्या हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या साखरेपैकी अजूनही ८० टक्के साखर गोडाऊनमध्येच पडून आहे. एफआरपी एकरकमी मिळावी, यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या होत्या. मात्र, गेला हंगाम सुरू होताना, साखर सर्वांत नीचांकी म्हणजे १८०० रुपये क्विंटलवर आली होती. त्यामुळे साखर कारखानदार डोक्याला हात लावून बसले होते. साखरेचे दर १८०० रुपये आणि एफआरपी २२०० ते २३०० रुपये देणार कसे? असा प्रश्न पडला होता. यावर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व राज्य सरकार यांनी एकत्र बसून एफआरपीचा ८०-२० चे नवीन सूत्र तयार केले. कारखान्यांनीही कारखाने सुरू झाल्यावर ८० टक्के, तर नुकतीच मे व जून महिन्यात उर्वरित २० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली. आता कर्ज काढून शेतकऱ्यांची एफआरपी तर भागवली आहे. मात्र, गोडाऊनमध्ये पडलेली साखर उचललीच गेली नाही. त्यामुळे बँकांची कर्ज व केंद्र सरकारच्या कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, असा प्रश्न कारखानदारांना भेडसावत आहे. करोडो रुपये गुंतवून कारखान्यांची साखर उचलायची, सरकारचे बेभरवशाचे धोरण, साखरेचे दर अचानक खाली आल्यास व्यापारी तोट्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून जादा साखर उचलली जात नाही. जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी मिळून १ कोटी १० लाख ४७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहेत. यातील आत्तापर्यंत २१ लाख ७९ हजार क्विंटलच साखरेचे विक्री झाली आहे. उर्वरित ८८ लाख ६७ हजार क्ंिवटल साखर पडून आहे. मात्र, एखाद्या साखर कारखान्याने ५ हजार पोती विक्रीसाठी ठेवली, तर त्यातील अवघी दीड ते दोन हजार पोती विकली जात आहेत. परिणामी, बँकेने वाढविलेल्या साखर मूल्यांकनाचाही कारखानदारांना काहीच फायदा होत नाही. साखरेबाबत सरकारचे धोरण काय राहील, याबाबत व्यापारी संभ्रमावस्थेत आहेत. सरकारी धोरण निश्चित नसल्याने व्यापारी साखर उचलत नाहीत. जर उचलली तर चाललेल्या बाजारभावापेक्षा कमी भावाने साखर मागत आहेत. जागतिक बाजारपेठेत साखरेला चांगले दर आहेत. मात्र, केंद्र सरकारने २० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. तर, कारखान्यांनी साखर निर्यात केली. तेव्हा टनाला ४५ रुपये अनुदान देण्याचे केंद्राचे धोरण साखरेचे दर वाढताच केंद्राने ते मागे घेतले. त्यामुळे एफआरपीमध्ये शेतकऱ्यांना टनाला ४५ रुपये कमी घ्यावे लागले. शेतकऱ्यांनी कारखान्यांना ते पैसे मागितले, तर कारखानदार हात झटकून मोकळे होत. केंद्राने दिले की आम्ही देऊ, असे म्हणून मोकळे झाले.साखर उत्पादितशिल्लककारखानासाखरसाखर सोमेश्वर१०४११००६३८०००माळेगाव१००९६००९०००००छत्रपती६०२०००५९६०००दौंड शुृगर१०३११००८४४०००घोडगंगा७१४३५०४२३४२४विघ्नहर११७४४००११०२००४३भिमाशंकर८९२४७०८४६८९८इंदापूर८२१५००५४९६९८निराभिमा४९८१००४२७९४०भिमापाटस३६०५५०४०६७७८संततुकाराम५८४५७५४०८६७७ राजगड१८७८२५१०६०००व्यंकटेश शुगर४९७८००२९००००श्रीनाथ म्हसकोबा५१७४००३२८०००अनुराज४०१२७०३२०९४५बारामती अ‍ॅँग्रो८३५१६०६६१४४२सरकारच्या वारंवार बदलत्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. ४ महिन्यांपूर्वी टनाला ४५ रुपये अनुदान देण्याचे सरकारने कबूल केले होते. साखरेचे दर वाढताच आज ते देत नाहीत. सरकारच्या अशा धरसोड धोरणामुळे साखर गोडाऊनमध्ये पडून आहे. सरकारचे धोरण आणि शेतकऱ्याचे मरण हे नेहमीचेच झाले आहे. - रंजन तावरे, अध्यक्ष माळेगाव कारखाना