शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

‘लॉकडाऊन’ उठताच वाढली भटक्या श्वानांची ‘दहशत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल होताच भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या कुत्र्यांना पकडून त्यांची दरवर्षी ...

पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल होताच भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. या कुत्र्यांना पकडून त्यांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नसबंदी केली जाते. परंतु, तरीदेखील शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. कुत्र्यांच्या नसबंदीवर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात आहे. परंतु, तरीही नागरिकांचा त्रास मात्र कमी झालेला नाही. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांमध्ये घबराट पसरली असून किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत.

शहरात गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या दीड लाखाच्या घरात पोहोचली असून, सन २०१८ सालात शहरातील नऊ हजारांहून अधिक नागरिकांचा चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर पसरलेला कचरा आणि खाद्यपदार्थ यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या अधिक वाढत चालली आहे. प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण ७०० ते ८०० नागरिकांना कुत्री चावत असल्याची आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गेल्या काही वर्षात वाढलेले हे प्रमाण कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने अत्यंत कमी झाले आहे. २०१९ सालात अवघ्या ७५० घटनांची नोंद करण्यात आली आहे. नागरिक बाहेर पडत नसल्याने कुत्रा चावण्याच्या घटना कमी झाल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे.

====

वर्ष घटना

२०१७ १० हजार ३४०

२०१८ ९ हजार १३४

२०१९ ७५०

====

नागरिकांकडून तक्रार आल्यास आरोग्य निरीक्षक भटकी कुत्री पकडून त्यांना डॉ. नायडू रुग्णालय किंवा मुंढव्यातील केंद्रामध्ये दाखल करतात. प्राणी संख्या नियंत्रण नियमांतर्गत (अ‍ॅनिमल बर्थ कंट्रोल रुल) त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करण्याबरोबरच त्यांना अँटी रेबीज लसही दिली जाते. तीन दिवसांनंतर ज्या भागातून कुत्री पकडण्यात आली होती; तेथेच पुन्हा सोडण्यात येतात. दरमहा हजार ते दिड हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते. कुत्री पकडण्यासाठी पालिके ची पाच आणि ब्ल्यू क्रॉस सोसायटी आॅफ पुणे या संस्थेच्या पाच अशा एकूण दहा गाड्या आहेत.

- डॉ. प्रकाश वाघ, प्रमुख, व्हेटरनरी विभाग, पुणे महापालिका

====

खाद्यपदार्थांच्या गाड्या, चायनीज, नॉन व्हेज हॉटेल्स, चिकन-मटणाची दुकाने आदींच्या परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. रात्रीच्या वेळी जाणा-या पादचारी तसेच वाहनचालकांच्या मागे ही कुत्री लागतात. त्यामुळे किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उपनगरे, नवीन समाविष्ठ गावे आणि मध्यवस्तीतही ही समस्या पहायला मिळते आहे.

====

भटकी कुत्री पकडण्यात आल्यानंतर त्यांची नसबंदी आणि लसीकरण केले जाते. त्यानंतर ही कुत्री पुन्हा ज्या भागातून पकडण्यात आली होती; त्याच भागात पुन्हा सोडण्यात येतात. त्यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होतच नाही.

====

मी रात्रीच्यावेळी कामावरुन घरी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेले भटके कुत्रे धावत पायाजवळ आले. त्याला वाचविण्याच्या नादात आणि मला त्याने चावा घेऊ नये या भितीमध्ये माझा गाडीवरील ताबा सुटला. मी गाडीसह रस्त्यावर पडल्याने मला गंभीर दुखापत झाली होती. रस्त्यांवरच्या भटक्या कु त्र्यांबद्दल मला आणखीनच भिती मनात बसली. या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.

- मनोज केदारे, नागरिक