शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प होते; शास्त्रीय धोरण आखायला हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST

पुणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले. कोरोना रोखण्यासाठीचा हा एकमेव उपाय असला, तरी त्यासोबत सरकारने ...

पुणे : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले. कोरोना रोखण्यासाठीचा हा एकमेव उपाय असला, तरी त्यासोबत सरकारने आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवावी, योग्य धोरण ठरवावे, मागील एक वर्ष हातात होते, तेव्हा आरोग्य सुविधा सक्षम करायला हव्या होत्या. आता तरी ठोस शास्त्रीय धोरण आखून अंमलबजावणी करावी, अशी मागणी जन आरोग्य अभियानाचे डॉ. अनंत फडके, डॉ. अभय शुक्ला यांनी सरकारकडे केली आहे.

देशातील सर्वच लोक बेजबाबदारपणे वागले असे म्हणणे उथळपणाचे होईल. दुसरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुकांमधील प्रचार, लग्नकार्ये, जत्रा, सण-समारंभ यामध्ये बेजबाबदारपणाने वागून बहुसंख्य पुढाऱ्यांनी लोकांपुढे चुकीची उदाहरणे घालून दिली. चांगली उदाहरणे पुढाऱ्यांनी घालून दिली असती तर बेजबाबदारपणाची साथ एवढी फोफावली नसती. एक वर्ष मिळूनही सार्वजनिक आरोग्यसेवेचे वाढीव बजेट, हॉस्पिटल खाटांमध्ये वाढ, त्यांच्यासाठी नवीन डॉक्टर्स व इतर स्टाफ, तसेच अनेकदा चर्चा झालेल्या रिक्त पदांची भरती इ. मार्फत सक्षमीकरणाच्या मागे पडलेल्या कामाला गती देणे हे सरकारने केले नाही.

राज्यभर विविध पातळ्यांवर पुरेशा स्टाफ सकट सक्षम खाटांची संख्या युद्धपातळीवर वाढवावी. महाराष्ट्रात दर वर्षी बॉन्ड लिहून दिलेले हजारो डॉक्टर बाहेर पडतात. त्यांना तात्पुरते तरी नेमावे व त्यांना वैद्यकीय महाविद्यालयातून टेलिमेडिसीन द्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे.

—————————-

सरकारने काय करायला हवे ?

सामान्य वर्गासाठी मोफत रेशन, वर-खर्चासाठी सरकारकडून बँकेत थेट रोख रक्कम ट्रान्सफर, दरमहा पन्नास युनिट पर्यंत वीज-बिल माफी, असे उपाय केले पाहिजेत.

लसीकरणासाठी वयोगटाची अट शिथिल करून सर्व कामगारांचे लसीकरण करावे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना ही लस खाजगी हॉस्पिटल्समध्ये मोफत द्यावी.

गावपातळीवर कोरोना समित्या स्थापन कराव्यात. यामध्ये सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांना अध्यक्ष व वैद्यकीय अधिकारी, नर्स ताई, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आशा व अंगणवाडी कार्यकर्ती, ग्राम पंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींचा समावेश करावा.

राज्यस्तरीय, स्थानिक टास्क फोर्स मध्ये पब्लिक हेल्थ तज्ज्ञांचा सहभाग असायला हवा. नाहीतर अशास्त्रीय आदेश निघतात.

आशा कार्यकर्त्यांना औषधे पुरवावीत. आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्यावे. सध्या राज्यात केवळ २०-२५ टक्के रुग्णवाहिका सुस्थितीत आहेत. त्यावर काम करावे.

—————————————