शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे प्रभावी माध्यम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 14:58 IST

साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूरांनी सहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी केले.

पुणे : बदलत्या काळातील विविध आव्हानांचा सामना सगळ्याच भाषांमधील साहित्याला करावा लागत आहे. साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूरांनी सहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी केले.

आचार्य अत्रे सभागृहात अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ.डी.वाय.पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित  'उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा' या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी. डी.पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून मिरासदार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले उपस्थित होते. यावेळी द. मा. मिरासदार यांनी सांगितलेल्या  ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वाद रसिकांनी घेतला. 

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, आज साहित्य क्षेत्रात प्रचंड चढ-उतार सुरु असून मोठ्या प्रमाणावर गाजलेल्या कसदार पुस्तकांच्या आवृत्या निघणे बंद झाले आहे. मराठी प्रकाशन व्यवसायाला नवसंजीवनी आणि चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी सरस्वतीचा ईश्वरी संकेत लक्षात घेऊन त्या दिशेने डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाने अक्षरधाराबरोबर टाकलेले हे पहिले पाऊल आहे. पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशकांनी लावलेल्या स्टॉल्सद्वारे मोठी आर्थिक उलाढाल झाली होती. सध्याची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आॅनलाईन सुविधेचा लाभ घेत आहे. मात्र, त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात सहकुटुंब जाऊन खरेदी करण्याचा आणि नव्या कोºया पुस्तकांचा दरवळ अनुभवण्याचा आनंद ही पिढी गमावते आहे, असे खेदाने म्हणावे लागते. वाचन संस्कृती टिकवायची आणि वाढवायची असेल तर कसदार लेखक आणि कवींची फळी निर्माण करावी लागेल.

अच्युत गोडबोले म्हणाले की, ललित आणि विज्ञान असे साहित्याचे दोन प्रकार करून त्यामध्ये डावे-उजवे करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. साहित्याचे हे दोन्ही प्रकार आपापल्या ठिकाणी तितकेच महत्त्वाचे असून या दोहोंची आपापली बलस्थाने आणि उणीवा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. पाश्चात्य ललित साहित्यामुळे मी लेखन करण्यास प्रवृत्त झालो. माणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज आहे. अलिकडे प्रकाशक देखील ललित साहित्य प्रकाशित करण्यास फारसे उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. अस्सल ललित लेखनाची निर्मिती आणि त्याचे प्रकाशन या दोन्ही बाबतीत आग्रही राहणे गरजेचे आहे. साडेतील टक्क्यांचे साहित्यिक आणि साहित्य ही चौकट मोडून समाजाच्या तळागाळातील जीवन जगून, अनुभवून मनाला भिडणाºया साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार साहित्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी केला पाहिजे. भविष्यात वाढणारे तंत्रज्ञानाचे महत्त्व वेळीच ओळखले पाहिजे. कारण आपल्यापर्यंत पोहोणारे साहित्य कसदार आहे की नाही हे महत्त्वाचे असून विशिष्ट घटक लिहितो आणि विशिष्ट घटक वाचतो, हे चित्र बदलले पाहिजे. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षरधाराच्या संचालक रसिका राठीवडेकर यांनी केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर अक्षरधाराचे संचालक रमेश राठीवडेकर यांनी आभार मानले.