शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे प्रभावी माध्यम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 14:58 IST

साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूरांनी सहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी केले.

पुणे : बदलत्या काळातील विविध आव्हानांचा सामना सगळ्याच भाषांमधील साहित्याला करावा लागत आहे. साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूरांनी सहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी केले.

आचार्य अत्रे सभागृहात अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ.डी.वाय.पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित  'उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा' या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी. डी.पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरून मिरासदार बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले उपस्थित होते. यावेळी द. मा. मिरासदार यांनी सांगितलेल्या  ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वाद रसिकांनी घेतला. 

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, आज साहित्य क्षेत्रात प्रचंड चढ-उतार सुरु असून मोठ्या प्रमाणावर गाजलेल्या कसदार पुस्तकांच्या आवृत्या निघणे बंद झाले आहे. मराठी प्रकाशन व्यवसायाला नवसंजीवनी आणि चैतन्य प्राप्त करून देण्यासाठी सरस्वतीचा ईश्वरी संकेत लक्षात घेऊन त्या दिशेने डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाने अक्षरधाराबरोबर टाकलेले हे पहिले पाऊल आहे. पिंपरी येथे झालेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशकांनी लावलेल्या स्टॉल्सद्वारे मोठी आर्थिक उलाढाल झाली होती. सध्याची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आॅनलाईन सुविधेचा लाभ घेत आहे. मात्र, त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात सहकुटुंब जाऊन खरेदी करण्याचा आणि नव्या कोºया पुस्तकांचा दरवळ अनुभवण्याचा आनंद ही पिढी गमावते आहे, असे खेदाने म्हणावे लागते. वाचन संस्कृती टिकवायची आणि वाढवायची असेल तर कसदार लेखक आणि कवींची फळी निर्माण करावी लागेल.

अच्युत गोडबोले म्हणाले की, ललित आणि विज्ञान असे साहित्याचे दोन प्रकार करून त्यामध्ये डावे-उजवे करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. साहित्याचे हे दोन्ही प्रकार आपापल्या ठिकाणी तितकेच महत्त्वाचे असून या दोहोंची आपापली बलस्थाने आणि उणीवा आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. पाश्चात्य ललित साहित्यामुळे मी लेखन करण्यास प्रवृत्त झालो. माणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज आहे. अलिकडे प्रकाशक देखील ललित साहित्य प्रकाशित करण्यास फारसे उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. अस्सल ललित लेखनाची निर्मिती आणि त्याचे प्रकाशन या दोन्ही बाबतीत आग्रही राहणे गरजेचे आहे. साडेतील टक्क्यांचे साहित्यिक आणि साहित्य ही चौकट मोडून समाजाच्या तळागाळातील जीवन जगून, अनुभवून मनाला भिडणाºया साहित्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. तसेच बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार साहित्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी केला पाहिजे. भविष्यात वाढणारे तंत्रज्ञानाचे महत्त्व वेळीच ओळखले पाहिजे. कारण आपल्यापर्यंत पोहोणारे साहित्य कसदार आहे की नाही हे महत्त्वाचे असून विशिष्ट घटक लिहितो आणि विशिष्ट घटक वाचतो, हे चित्र बदलले पाहिजे. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षरधाराच्या संचालक रसिका राठीवडेकर यांनी केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले, तर अक्षरधाराचे संचालक रमेश राठीवडेकर यांनी आभार मानले.