शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

साहित्यिकांनी मते थोपवू नयेत : न. म. जोशी

By admin | Updated: February 22, 2015 00:43 IST

साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात.

पुणे : साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात. त्यामुळे समाजातील काही संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींबद्दल कधीही स्पष्टपणे न बोलता लेखनातून फटकारे मारले. त्यांना हेच जास्त झोंबते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.निनाद संस्थेतर्फे डॉ. जोशी यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानयोगी गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत आलेले अनुभव, आठवणी उपस्थितांसमोर दिलखुलासपणे मांडल्या. भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या वेळी नगरसेवक दिलीप काळोखे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, डॉ. दिलीप गरूड, चंद्रकांत सणस, शुभदा जोशी, उदय जोशी अनिल गानू आदी उपस्थित होते. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीतून डॉ. जोशी यांचा जीवनप्रवास उलगडला. डॉ. जोशी म्हणाले, ‘‘सध्याची शिक्षणपद्धती कृत्रिम आहे. सध्या शिक्षक मुलांना शब्दार्थ नव्हे; तर शब्दांचे प्रतिशब्द शिकवितात. तंत्रज्ञानाचे माणुसकीवर आक्रमण होत असून त्याचा अतिरेक होऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीची आठवणही डॉ. जोशी यांनी या वेळी सांगितली.’’ डॉ. जोशी यांचा गौरव करताना बापट म्हणाले, ‘‘न. म. म्हणजे ‘न’त ‘म’स्तक व्हावे, असे व्यक्तिमत्त्व आहे. स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व स्तरांतील लोकांना करून देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद दिसतो.’’ ‘‘शिक्षक समाजाचे नेतृत्व करीत असल्याचा एक काळ होऊन गेला. आज ही परंपरा खंडित झाली आहे,’’ अशी खंत डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)