शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांनी मते थोपवू नयेत : न. म. जोशी

By admin | Updated: February 22, 2015 00:43 IST

साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात.

पुणे : साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात. त्यामुळे समाजातील काही संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींबद्दल कधीही स्पष्टपणे न बोलता लेखनातून फटकारे मारले. त्यांना हेच जास्त झोंबते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.निनाद संस्थेतर्फे डॉ. जोशी यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानयोगी गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत आलेले अनुभव, आठवणी उपस्थितांसमोर दिलखुलासपणे मांडल्या. भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या वेळी नगरसेवक दिलीप काळोखे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, डॉ. दिलीप गरूड, चंद्रकांत सणस, शुभदा जोशी, उदय जोशी अनिल गानू आदी उपस्थित होते. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीतून डॉ. जोशी यांचा जीवनप्रवास उलगडला. डॉ. जोशी म्हणाले, ‘‘सध्याची शिक्षणपद्धती कृत्रिम आहे. सध्या शिक्षक मुलांना शब्दार्थ नव्हे; तर शब्दांचे प्रतिशब्द शिकवितात. तंत्रज्ञानाचे माणुसकीवर आक्रमण होत असून त्याचा अतिरेक होऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीची आठवणही डॉ. जोशी यांनी या वेळी सांगितली.’’ डॉ. जोशी यांचा गौरव करताना बापट म्हणाले, ‘‘न. म. म्हणजे ‘न’त ‘म’स्तक व्हावे, असे व्यक्तिमत्त्व आहे. स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व स्तरांतील लोकांना करून देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद दिसतो.’’ ‘‘शिक्षक समाजाचे नेतृत्व करीत असल्याचा एक काळ होऊन गेला. आज ही परंपरा खंडित झाली आहे,’’ अशी खंत डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)