शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

साहित्यिकांनी मते थोपवू नयेत : न. म. जोशी

By admin | Updated: February 22, 2015 00:43 IST

साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात.

पुणे : साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात. त्यामुळे समाजातील काही संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींबद्दल कधीही स्पष्टपणे न बोलता लेखनातून फटकारे मारले. त्यांना हेच जास्त झोंबते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.निनाद संस्थेतर्फे डॉ. जोशी यांना ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानयोगी गौरव पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या वेळी त्यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत आलेले अनुभव, आठवणी उपस्थितांसमोर दिलखुलासपणे मांडल्या. भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. या वेळी नगरसेवक दिलीप काळोखे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, डॉ. दिलीप गरूड, चंद्रकांत सणस, शुभदा जोशी, उदय जोशी अनिल गानू आदी उपस्थित होते. निवेदक सुधीर गाडगीळ यांनी मुलाखतीतून डॉ. जोशी यांचा जीवनप्रवास उलगडला. डॉ. जोशी म्हणाले, ‘‘सध्याची शिक्षणपद्धती कृत्रिम आहे. सध्या शिक्षक मुलांना शब्दार्थ नव्हे; तर शब्दांचे प्रतिशब्द शिकवितात. तंत्रज्ञानाचे माणुसकीवर आक्रमण होत असून त्याचा अतिरेक होऊ नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीची आठवणही डॉ. जोशी यांनी या वेळी सांगितली.’’ डॉ. जोशी यांचा गौरव करताना बापट म्हणाले, ‘‘न. म. म्हणजे ‘न’त ‘म’स्तक व्हावे, असे व्यक्तिमत्त्व आहे. स्वत:च्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व स्तरांतील लोकांना करून देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आनंद दिसतो.’’ ‘‘शिक्षक समाजाचे नेतृत्व करीत असल्याचा एक काळ होऊन गेला. आज ही परंपरा खंडित झाली आहे,’’ अशी खंत डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)