शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मद्यदुकानांना लागले अखेर कुलूप

By admin | Updated: April 2, 2017 02:49 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शनिवारपासून महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत असलेले वाईन्स शॉप्स आणि रेस्टॉरंट्स अ‍ॅण्ड बार बंद करण्यात आले.

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शनिवारपासून महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत असलेले वाईन्स शॉप्स आणि रेस्टॉरंट्स अ‍ॅण्ड बार बंद करण्यात आले. त्याचा फटका जवळपास ८० टक्के हॉटेल्स आणि मद्य विक्रेत्यांना बसला. परिणामी मद्य विक्री सुरु असलेल्या तुरळक ठिकाणी मद्यप्रेमींची गर्दी उसळली होती. सर्वोच्च न्यायालयाने महामार्गालगतच्या वाईन्स शॉप्स आणि बार बंद करण्याचा निर्णय दिला आहे. शहरात महामार्गालगत १९५० बार असून, जवळपास पाचशे वाईन्स शॉप्स आहेत. शहरात पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक, मुंबई-बेंगळुरु महामार्ग आणि नगर रस्ता असे महामार्ग जातात. या निर्णयाचा फटका शहर हद्दीतून जाणाऱ्या महामार्गालगतच्या वाईन्सशॉप्स आणि बारला देखील बसला आहे. पुणे रेस्टॉरंट्स हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले, शहर हद्दीतून जाणारे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत. येथील वाईन्स आणि बार चालकही महापालिकेकडे कर भरतात. मात्र, महापालिकेने रस्ते हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न केल्याने येथील वाईन्स आणि बार चालकांवर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे शहरातील ८० टक्के बार आणि वाईन्स शॉप चालकांना फटका बसला. इंडियन ग्रेप असोसिएशन बोर्डाचे माजी अध्यक्ष, जगदीश होळकर म्हणाले, हॉटेल्सच्या माध्यमातून वाईन्स अथवा इतर पेय घेणाऱ्यांची संख्या ७० टक्के इतकी आहे. तर केवळ तीस टक्के व्यक्ती वाईन्स शॉप्समधून खरेदी करतात. या निर्णयामुळे राज्यातील ८० टक्के वाईन्स आणि बार बंद होते. याचा फटका वाईन या आरोग्यदायी पेयाला देखील बसला आहे. खरेतर वाईन आणि इतर मद्य असा फरक सरकारने केला पाहीजे. याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.(प्रतिनिधी)