शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

वारकऱ्यांचा पत्र ते मोबाइल प्रवास व्हाया एसटीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:22 IST

पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात.

पुणे - पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात. तसेच प्रवासाची माहितीदेखील अगदी सहजपणे मोबाइलच्या माध्यमातून घरच्यांना देत आहेत. मात्र सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी ही सर्व परिस्थिती पूर्णत: वेगळी होती.मोबाइलच्या उपलब्धतेमुळे सध्या वारकरी व त्यांचे कुटुंबीय काही क्षणांत एकमेकांशी कनेक्ट होत आहे. मात्र, दोन ते तीन दशकांपूर्वी वारकºयांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी टपालसेवा हे सक्षम व माफक माध्यम होते. त्या काळी टपाल खात्याने वारीतही पत्र पोहोचविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली होती. घरी काही महत्त्वाची घटना घडली, तर वारीच्या वाटेवर तारही येत होती. मात्र, वारकºयांच्या हातात मोबाइल आल्याने वारीतील टपालचे प्रमाण कमी झाले आहे.वारीत सहभागी झालेल्याचे नाव व मुक्काम पोस्ट आणि संत ज्ञानेश्वर महाराज की संत तुकारामांची पालखी, त्यातील दिंडी क्रमांक असा पत्ता पत्रावर टाकला की त्या-त्या वारकºयापर्यंत पत्र पोहोचत होते. राज्यातील कोणत्याही टपाल कार्यालयात वारीचे पत्र आले की, ते प्रथम पुणे किंवा पंढरपूरच्या टपाल कार्यालयांमध्ये जमा होई. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या स्थळापासून जवळच्या गावातील टपाल कार्यालयात हे पत्र पाठविले जात होते. त्या-त्या गावातील पोस्टमन पालखी सोहळ्याच्या चोपदाराकडे पत्र देत. साधारण दुपारच्या जेवणानंतर पालखी मार्गस्थ होत असताना एका ठिकाणी थांबून चोपदार त्या-त्या दिंडीत पत्रांचे वाटप करत असे.असे पाठवले जात वारीतून पत्रवारीत पत्र येण्याबरोबरच वारीतून पत्र पाठविण्याचीही खास व्यवस्था होती. पालखी मुक्कामाच्या गावात काही शाळा हा उपक्रम राबवीत होत्या. लोणंद येथील शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे दहा-पंधरा पोस्टकार्ड दिली जायची. घरी पत्र पाठविण्याची इच्छा असलेले वारकरी या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेत.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPuneपुणे