शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वारकऱ्यांचा पत्र ते मोबाइल प्रवास व्हाया एसटीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 02:22 IST

पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात.

पुणे - पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात. तसेच प्रवासाची माहितीदेखील अगदी सहजपणे मोबाइलच्या माध्यमातून घरच्यांना देत आहेत. मात्र सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी ही सर्व परिस्थिती पूर्णत: वेगळी होती.मोबाइलच्या उपलब्धतेमुळे सध्या वारकरी व त्यांचे कुटुंबीय काही क्षणांत एकमेकांशी कनेक्ट होत आहे. मात्र, दोन ते तीन दशकांपूर्वी वारकºयांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी टपालसेवा हे सक्षम व माफक माध्यम होते. त्या काळी टपाल खात्याने वारीतही पत्र पोहोचविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली होती. घरी काही महत्त्वाची घटना घडली, तर वारीच्या वाटेवर तारही येत होती. मात्र, वारकºयांच्या हातात मोबाइल आल्याने वारीतील टपालचे प्रमाण कमी झाले आहे.वारीत सहभागी झालेल्याचे नाव व मुक्काम पोस्ट आणि संत ज्ञानेश्वर महाराज की संत तुकारामांची पालखी, त्यातील दिंडी क्रमांक असा पत्ता पत्रावर टाकला की त्या-त्या वारकºयापर्यंत पत्र पोहोचत होते. राज्यातील कोणत्याही टपाल कार्यालयात वारीचे पत्र आले की, ते प्रथम पुणे किंवा पंढरपूरच्या टपाल कार्यालयांमध्ये जमा होई. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या स्थळापासून जवळच्या गावातील टपाल कार्यालयात हे पत्र पाठविले जात होते. त्या-त्या गावातील पोस्टमन पालखी सोहळ्याच्या चोपदाराकडे पत्र देत. साधारण दुपारच्या जेवणानंतर पालखी मार्गस्थ होत असताना एका ठिकाणी थांबून चोपदार त्या-त्या दिंडीत पत्रांचे वाटप करत असे.असे पाठवले जात वारीतून पत्रवारीत पत्र येण्याबरोबरच वारीतून पत्र पाठविण्याचीही खास व्यवस्था होती. पालखी मुक्कामाच्या गावात काही शाळा हा उपक्रम राबवीत होत्या. लोणंद येथील शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे दहा-पंधरा पोस्टकार्ड दिली जायची. घरी पत्र पाठविण्याची इच्छा असलेले वारकरी या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेत.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPuneपुणे