शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चिंताजनक : साहित्यिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 20:40 IST

समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे’, अशी मागणी....

ठळक मुद्देराज्य भयमुक्त करण्याची मागणीलेखक-कवींचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य ही चिंतेची बाब राज्यातील सुमारे २५० साहित्यिक, कवी आणि पत्रकारांचा समावेश

पुणे : ‘मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेतील एका ओळीचा चुकीचा अर्थ लावून कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आहे. लेखक-कवींचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य ही चिंतेची बाब आहे’, अशी नाराजी व्यक्त करत, ‘कवितेसंदर्भात निर्माण झालेला हा वाद मिटवावा, समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे’, अशी मागणी राज्यातील सुमारे २५० साहित्यिक, कवी आणि पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.काही तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग आणि कवी दिनकर मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी या गोष्टी आम्हाला अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात. कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याच्या या कृती कवीच्या लेखन व नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत, याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे.ना. धों. महानोर, रामदास भटकळ, रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, किशोर कदम (सौमित्र), हरिश्चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, हेमंत दिवटे, जयंत पवार, गणेश विसपुते, संतोष पद्माकर पवार, प्रज्ञा दया पवार, निरजा, सुमती लांडे, अभय सरदेसाई, दा. गो. काळे, बाबा भांड, इग्नेशियस डायस, रणधीर शिंदे, चिन्मयी सुमित राघवन, सचिन केतकर, सलील वाघ, सुधाकर गायधनी, आश्लेषा महाजन, समीर दळवी, खलील मोमीन, नीलिमा कुलकर्णी आदींसह सुमारे अडीचशे लेखक, कवींचा यामध्ये समावेश आहे. -------------कविता वगळण्याचा निर्णय हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी गोष्ट आहे. आदिवासी स्त्रीचा संदर्भ कवितेच्या ओघात आला आहे. यामध्ये स्त्रीला कमी लेखण्याचा अथवा स्त्री उपलब्ध आहे, असे दाखवण्याचा कोणताही हेतू नाही. हा कवितासंग्रह चार-पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. इतक्या वर्षात तो वाचला गेला नाही किंवा त्यावर चर्चाही झाली नाही. अभ्यासक्रमात आल्यानंतर अचानक शोध लागल्याप्रमाणे या कवितेला विरोध केला जात आहे. याबाबत अस्मितेचा प्रश्न निर्माण करुण काही संघटनांकडून राजकारण केले जात आहे. स्तन हा इतर अवयवांप्रमाणेच एक अवयव आहे. मग त्याबाबत सोवळेपणा का पाळायचा? निषिध्द मानण्याची काय गरज? असे विचार घेऊन आपण कोठे चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.- आश्लेषा महाजन, कवयित्री-------------------कविता समजून न घेता केवळ आरोप करणे हे दबावतंत्र आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. लेखकाला आपले मत मांडण्याचे, लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. लेखकाला समजून घेता आले तरच समाजातील संस्कृती निरोगी आहे, असे म्हणता येईल. अराजकसदृश वादविवाद निर्माण होणार असतील तर ते कीड लागलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. - गणेश विसपुते, भाषा अभ्यासक 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसliteratureसाहित्य