शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी चिंताजनक : साहित्यिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 20:40 IST

समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे’, अशी मागणी....

ठळक मुद्देराज्य भयमुक्त करण्याची मागणीलेखक-कवींचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य ही चिंतेची बाब राज्यातील सुमारे २५० साहित्यिक, कवी आणि पत्रकारांचा समावेश

पुणे : ‘मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं असतं’ या कवितेतील एका ओळीचा चुकीचा अर्थ लावून कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आहे. लेखक-कवींचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य ही चिंतेची बाब आहे’, अशी नाराजी व्यक्त करत, ‘कवितेसंदर्भात निर्माण झालेला हा वाद मिटवावा, समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे’, अशी मागणी राज्यातील सुमारे २५० साहित्यिक, कवी आणि पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.काही तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग आणि कवी दिनकर मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी या गोष्टी आम्हाला अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात. कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याच्या या कृती कवीच्या लेखन व नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत, याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे.ना. धों. महानोर, रामदास भटकळ, रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, किशोर कदम (सौमित्र), हरिश्चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, हेमंत दिवटे, जयंत पवार, गणेश विसपुते, संतोष पद्माकर पवार, प्रज्ञा दया पवार, निरजा, सुमती लांडे, अभय सरदेसाई, दा. गो. काळे, बाबा भांड, इग्नेशियस डायस, रणधीर शिंदे, चिन्मयी सुमित राघवन, सचिन केतकर, सलील वाघ, सुधाकर गायधनी, आश्लेषा महाजन, समीर दळवी, खलील मोमीन, नीलिमा कुलकर्णी आदींसह सुमारे अडीचशे लेखक, कवींचा यामध्ये समावेश आहे. -------------कविता वगळण्याचा निर्णय हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी गोष्ट आहे. आदिवासी स्त्रीचा संदर्भ कवितेच्या ओघात आला आहे. यामध्ये स्त्रीला कमी लेखण्याचा अथवा स्त्री उपलब्ध आहे, असे दाखवण्याचा कोणताही हेतू नाही. हा कवितासंग्रह चार-पाच वर्षांपूर्वी प्रकाशित झाला. इतक्या वर्षात तो वाचला गेला नाही किंवा त्यावर चर्चाही झाली नाही. अभ्यासक्रमात आल्यानंतर अचानक शोध लागल्याप्रमाणे या कवितेला विरोध केला जात आहे. याबाबत अस्मितेचा प्रश्न निर्माण करुण काही संघटनांकडून राजकारण केले जात आहे. स्तन हा इतर अवयवांप्रमाणेच एक अवयव आहे. मग त्याबाबत सोवळेपणा का पाळायचा? निषिध्द मानण्याची काय गरज? असे विचार घेऊन आपण कोठे चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.- आश्लेषा महाजन, कवयित्री-------------------कविता समजून न घेता केवळ आरोप करणे हे दबावतंत्र आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेमध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. लेखकाला आपले मत मांडण्याचे, लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. लेखकाला समजून घेता आले तरच समाजातील संस्कृती निरोगी आहे, असे म्हणता येईल. अराजकसदृश वादविवाद निर्माण होणार असतील तर ते कीड लागलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. - गणेश विसपुते, भाषा अभ्यासक 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसliteratureसाहित्य