शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

कालिदास नगरे लोकमत न्यूज नेटवर्क पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू ...

कालिदास नगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. या कंपनीच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांचे आम्ही लवकरच पुनर्वसन करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची परिस्थिती तीव्रता भयानक होती की या कंपनीमधील सर्व जळून खाक झाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखत कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बच्चू कडू म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील राज्यातील ही सर्वात मोठी व गंभीर घटना आहे. कामगारांच्या सुरक्षेची कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ज्या कामासाठी परवानगी घेतली होती, त्याऐवजी दुसरेच उत्पादन या ठिकाणी सुरू असल्याचे दिसत आहे, तर या घटनेची योग्य ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

मृत पावलेल्या कामगारांना योग्य ती मदत मिळवून दिले जाईलच. सर्व कामगार हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना मदत तर दिली जाईलच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. येत्या पंधरा दिवसांत त्यांचे पुर्नवसन केले जाईल. कंपनीच्या निष्काळजीपणाच या घटनेला कारणीभूत असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

फोटो ओळ : पिरंगुट येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एस.व्ही.एस कंपनीची पाहणी करताना राज्यमंत्री बच्चू कडू.