शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

कालिदास नगरे लोकमत न्यूज नेटवर्क पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू ...

कालिदास नगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. या कंपनीच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांचे आम्ही लवकरच पुनर्वसन करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची परिस्थिती तीव्रता भयानक होती की या कंपनीमधील सर्व जळून खाक झाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखत कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बच्चू कडू म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील राज्यातील ही सर्वात मोठी व गंभीर घटना आहे. कामगारांच्या सुरक्षेची कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ज्या कामासाठी परवानगी घेतली होती, त्याऐवजी दुसरेच उत्पादन या ठिकाणी सुरू असल्याचे दिसत आहे, तर या घटनेची योग्य ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

मृत पावलेल्या कामगारांना योग्य ती मदत मिळवून दिले जाईलच. सर्व कामगार हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना मदत तर दिली जाईलच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. येत्या पंधरा दिवसांत त्यांचे पुर्नवसन केले जाईल. कंपनीच्या निष्काळजीपणाच या घटनेला कारणीभूत असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

फोटो ओळ : पिरंगुट येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एस.व्ही.एस कंपनीची पाहणी करताना राज्यमंत्री बच्चू कडू.