शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

कालिदास नगरे लोकमत न्यूज नेटवर्क पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू ...

कालिदास नगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

पिरंगुट : उरवडे येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी कंपनीला कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. या कंपनीच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांचे आम्ही लवकरच पुनर्वसन करू, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास एसव्हीएस एक्वा टेक्नॉलॉजी या कंपनीला भीषण आग लागली होती. या आगीमध्ये १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची परिस्थिती तीव्रता भयानक होती की या कंपनीमधील सर्व जळून खाक झाले आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखत कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

बच्चू कडू म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील राज्यातील ही सर्वात मोठी व गंभीर घटना आहे. कामगारांच्या सुरक्षेची कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. ज्या कामासाठी परवानगी घेतली होती, त्याऐवजी दुसरेच उत्पादन या ठिकाणी सुरू असल्याचे दिसत आहे, तर या घटनेची योग्य ती चौकशी पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

मृत पावलेल्या कामगारांना योग्य ती मदत मिळवून दिले जाईलच. सर्व कामगार हे सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना मदत तर दिली जाईलच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. येत्या पंधरा दिवसांत त्यांचे पुर्नवसन केले जाईल. कंपनीच्या निष्काळजीपणाच या घटनेला कारणीभूत असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

फोटो ओळ : पिरंगुट येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या एस.व्ही.एस कंपनीची पाहणी करताना राज्यमंत्री बच्चू कडू.