जुन्नर : धामणखेल येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. दोन दिवसांपूर्वी या परिसरात पिंजरा लावला होता. या परिसरात अद्यापही चार बिबटे वावरत असल्याचे ग्रामस्थांमध्ये म्हणणे आहे.मंदिराच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा उपद्रव वाढला होता. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने विष्णू वर्पे यांच्या गोठ्यातील आठ शेळ्या मारल्या होत्या. वनविभागाने तातडीने दोन दिवसांपूर्वी याठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. प्रदीप कोंडे यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या अडकला. पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रामध्ये हलविण्यात आले आहे. पकडलेला हा नर बिबट्या असून, पाच-साडेपाच वर्षे वयाचा आहे. त्याला कोणतीही जखम झालेली नाही. माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.वनपरिक्षेत्र कार्यालय हलविल्याने संतापनारायणगाव : वनपरिक्षेत्र पुनर्रचनेत नारायणगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर येथे हलविण्यात आल्याने जुन्नर तालुक्यात संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. नारायणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत बिबट्यांचा सर्वांत जास्त वावर असताना हे कार्यालय का हलविण्यात आले? असा सवाल केला जात आहे.
धामणखेल येथे बिबट्या जेरबंद
By admin | Updated: November 17, 2016 02:52 IST