शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

खर्चिक असूनही इंग्रजीकडे ओढा

By admin | Updated: May 12, 2017 05:14 IST

मुलांच्या शाळा प्रवेशासाठी, सध्या पालकांची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही बहुतांश पालकांचा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मुलांच्या शाळा प्रवेशासाठी, सध्या पालकांची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही बहुतांश पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्याचे दिसुन येते. आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे, या मानसिकतेतुन पालकांचा मोठ्याप्रमाणात कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. परंतु, इंग्रजी भाषा ही काळाची गरज असली तरीही, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतुन मिळणारे शिक्षण हे जास्त गरजेचे आहे असे शहरातील काही पालक संघटना, शिक्षक संघटना व प्राचार्य यांचे मत आहे.एखादी गोष्ट समजुन घेण्यासाठी व ती चिरकाल लक्षात राहण्यासाठी मातृभाषेतुन ती समजुन घेणे जास्त महत्त्वाचे असते. आपल्याकडे इंग्रजीचे अनावश्यक फॅड वाढत चालले आहे. त्यामुळे विद्यार्थी विषय समजुन न घेता केवळ घोकंपट्टीच करतात . सध्या मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे धाव घेऊ लागले आहेत. सीबीएसइ व आयसीएसइ यांची संलग्नता मिळविण्यासाठी खासगी शाळा प्रयत्नशील आहेत. परंतु, घरी विद्यार्थ्याच्या कानावर न पडलेल्या भाषेत त्यांना एकदम प्राथमिक शिक्षण दिले तर त्यांच्या शिकण्याच्या पध्दतीवर विपरीत परीणाम होतो. सुरूवातीची सात-आठ वर्षे शिक्षण मातृभाषेतून मिळाले तर दोन्ही भाषा मुले अधिक चांगल्या प्रकारे अवगत करु शकतात. असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.