शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

नीरा-देवघरच्या कालव्यातून गळती

By admin | Updated: March 29, 2017 00:02 IST

नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन आठ दिवसांपासून चालू आहे़ मात्र कालव्याचे अस्तरीकरणाचे काम

नेरे : नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे दुसरे आवर्तन आठ दिवसांपासून चालू आहे़ मात्र कालव्याचे अस्तरीकरणाचे काम रखडल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन लाखो लिटरची नासाडी होत आहे़तालुक्यातील पश्चिम, दक्षिण भागात वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई आहे़ या भागातून दोन धरणांचे दोन कालवे गेलेले आहेत़ या कालव्याच्या पाण्यावर परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग, ऊस, कांदा, भाजीपाला या पिकांची लागवड केलेली आहे़ कालव्याची दोन आवर्तने वेळेत सोडल्याने पिके चांगली आली आहेत. एकीकडे वीसगाव खोऱ्यात शेतकरी धोम-बलकवडी धरणाचे आवर्तन सोडण्याची मागणी करीत आहेत़ दुसरीकडे नीरा-देवघर धरणाचे आवर्तन सोडण्यात आले आहे़ मात्र नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती आसल्याने ठिकठिकाणी लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ कालव्याच्या अतिगळतीमुळे कालव्याखालील शेती, पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ कालव्याच्या अस्तरीकरणाचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार व पाण्याची गळती कधी थांबणार? असा प्रश्न नागरिक, शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)कालव्याची कामे अपूर्ण आहेत, याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाकडून २२ मार्चला जागतिक जलदिन साजरा केला जातो, पाणीबचतीसाठी बऱ्याच काही उपाययोजना, घोषणा केल्या जातात़ मात्र, गळती व पाण्याच्या नासाडीकडे दुर्लक्ष होते. एकीकडे भोर तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे कालव्याच्या गळतीने लाखो लिटर पाणी वाया जात आहे़