शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

हसविणे म्हणजेच समाजसेवा

By admin | Updated: May 10, 2017 04:21 IST

ताणतणावांचा सामना करणाऱ्या समाजाला विडंबन आणि विनोदाच्या माध्यमातून हसविणे म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी येथे व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ताणतणावांचा सामना करणाऱ्या समाजाला विडंबन आणि विनोदाच्या माध्यमातून हसविणे म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी येथे व्यक्त केले.रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ हास्यकवी आणि एकपात्री कलावंत बण्डा जोशी यांच्या हास्यकवितांच्या कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तेंडुलकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जागतिक हास्यदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर उपस्थित होते. या वेळी जोशी यांच्या हास्यकवितांचा ‘चला, हशा येऊ द्या !’ हा कार्यक्रम झाला. तेंडुलकर म्हणाले, ‘‘पूर्वीच्या काळात गंभीर राहण्याची वृत्ती होती. मात्र आचार्य अत्रे आणि पु. ल. देशपांडे यांच्यामुळे महाराष्ट्र खळखळून हसायला शिकला. विडंबन कविता आणि विनोदी कथांच्या माध्यमातून बण्डा जोशी ही परंपरा पुढे नेत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. अलीकडे विडंबनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून विडंबन म्हणजे मूळ लेखनावर केलेली टीका नसून त्या मूळ लेखनाच्या लोकप्रियतेला मिळणारी दाद असते. कारण काव्य किंवा लेखन लोकप्रिय असल्याशिवाय त्यावर विडंबन होत नाही.’’ माझ्या कारकिर्दीत रसिकांचा मोठा वाटा असून, त्यांच्या प्रतिसादाशिवाय ही कामगिरी अशक्य असल्याची भावना जोशी यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.