शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

पूल मोजतोय अखेरच्या घटका

By admin | Updated: February 18, 2017 02:43 IST

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पिंपरी-साकेरी यादरम्यान असणारा जुना पूल अखेरच्या घटका मोजत आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पिंपरी-साकेरी यादरम्यान असणारा जुना पूल अखेरच्या घटका मोजत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यामध्ये असणारा पिंपरी व साकेरी ही दोन गावे जोडणारा गुहीरा या नदीवरील पूल जुना झाल्याने हा पूल मृत्युचा सापळा बनला आहे. अत्यंत धोकादायक असणाऱ्या या पुलाचे कठडे तुटले आहेत. त्याचप्रमाणे जुना झालेल्या या पुलाची दगडी कोसळत आहेत. पिंपरी व साकेरी ग्रामस्थांनी या पुलाबाबत प्रशासनाला कळवले असून, प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे साकेरी येथील सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र कढण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पिंपरीवरुन साकेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुहीरा नदीवर असलेल्या या पुलाच्या पुढे साकेरी गावठाण, गवारवाडी, खडकवाडी, मोहंडुळेवाडी, वनघरटेप, आडारीवस्ती, कारोटेवस्ती, या गावातील ग्रामस्थांची नेहमीच या पुलावरुन वर्दळ असते. साकेरी व या परिसरातील गावातील शाळेतील मुलांना या पुलावरुनच ये-जा करावी लागते. कठडा नसलेल्या व दुरवस्था झालेल्या या पुलावर ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जावे लागते.श्रावण महिन्यामध्ये पिंपरी येथील महिला साळाबाई बांबळे या जनावरे चरावयासाठी पुलावरुन पलीकडे जात असताना पाय घसरुन नदीत पडून मृत्यू पावल्या. या पुलाला कठडे असते तर या महिलेचा जीव वाचला असता. आम्ही ग्रामस्थांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. ही मोठी घटना घडूनही प्रशासनाला जाग आली नाही, असे साकेरी ग्रामस्थ अशोक तारडे व मच्छिंद्र कढण यांनी सांगितले. प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महादू गवारी, साकेरीचे ग्रामस्थ अशोक तारडे, मच्छिंद्र कढण, होनाजी आढारी, सखाराम आढारी यांनी केली आहे. (वार्ताहर) साकेरी हे गाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अत्यंत डोेंगरदऱ्या-खोऱ्यामध्ये वसलेले गाव असून, या गावामध्ये भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. साठ ते सत्तर घरे असणाऱ्या गावामध्ये दळणवळणासाठी गेली कित्येक वर्षांपूर्वी गुहीरा नदीवर पूल बांधण्यात आला. यामुळे या गावांचा संपर्क पाटण खोऱ्याशी येऊ लागला. या गावामध्ये आजारी पडलेल्या ग्रामस्थाला डोली करून दहा किमी असणाऱ्या तळेघर येथे आणावे लागत असे, परंतु हा पूल झाल्यानंतर या गावातील ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटला होता.