शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या हातातली शेवटची निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 01:02 IST

आठवणीतील निवडणूक ...

अभय कुलकर्णी

जनतेनं हातात घेतलेली निवडणूक पत्रकार म्हणून अनेक लोकसभा व विधानसभा निवडणुका कव्हर करता आल्या. परंतु आठवणीतली निवडणूक आजही १९७७ चीच म्हणता येईल. त्या वेळचं भारावलेलं वातावरण आजही डोळ्यांसमोर लख्ख आहे. मी आठवीत होतो. मुळात लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील की नाही, अशी शंका असताना त्या जाहीर झाल्या. आणीबाणीत १९ महिने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारी जनता निकराच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरलेली.

जनता पक्षाच्या झेंड्याखाली जनता एकवटली होती. जयप्रकाश नारायण, आचार्य कृपलानी, मोरारजी देसाई, चौधरी चरणसिंग, अटलबिहारी वाजपेयी, चंद्रशेखर, जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव घेतले, तरी गर्दीत चैतन्य संचारत असे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामींची पुण्यात शनिवारवाड्यावर अभूतपूर्व गर्दीची सभा झाली. निधीसाठी आवाहन झाले. कार्यकर्ते चादरी घेऊन गर्दीत फिरू लागले आणि नागरिक अंगठ्या, सोन्याच्या चेन्स, सोन्याच्या बांगड्या उत्स्फूर्तपणाने काढून देत होते. नाण्यांचा तर वर्षाव होत होता. जनता पक्ष नावाचा पक्ष अधिकृतपणाने स्थापनही झालेला नव्हता, पण पुण्यातून मोहन धारिया यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अक्षरश: हजारो कार्यकर्ते कामाला लागले. घराघरांत महिला स्लिपा लिहिण्याचं काम करत होत्या. खरंतर सबंध जनताच जनता पक्षाची कार्यकर्ता बनली होती. काँग्रेससकडे त्या वेळी गुंडांचा मोठा भरणा होता आणि सत्तेची सूत्रे ताब्यात होती, परंतु अनेक वस्त्यांत सामान्य माणसानं गुंडांच्या आरेला कारे करून उत्तर दिलं. काकाकुवा मॅन्शन हे जनता पक्षाचं कार्यालय होतं. ते चोवीस तास कार्यकर्त्यांच्या गर्दीने भरून गेलेलं असे. रात्री शहरात अनेक तरुणांचे जत्थे घेऊन भिंती रंगवण्याची जबाबदारी स्वयंस्फूर्तीने पार पाडत होते.

शहरात कोणत्याही नेत्याची सभा असो, हजारो लोक सभेच्या ठिकाणी धावत होते. ‘लोकसभेचा मानकरी’, ‘नांगरधारी शेतकरी’, नसबंदी के तीन दलाल इंदिरा, संजय, बन्सीलाल, अंधेरे में एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश या घोषणांनी पुणेच काय, देश दुमदुमत होता. मित्रांना, नातेवाइकांना पोस्टकार्ड पाठवून मतदानाचं आवाहन केलं जात होतं. अण्णा जोशी, भाई वैद्य, एस. एम. जोशी, रामभाऊ वडके, सुभाष सर्वगौड असे अनेक नेते शहरभर कॉर्नर मीटिंग्ज घेऊन वातावरण ढवळून काढत होते. परत काँग्रेस सत्तेवर येणं म्हणजे देशात हुकूमशाही प्रस्थापित होणं, याची खूणगाठ बांधलेला भारतीय मतदार सर्व ताकदीनिशी त्या निवडणुकीत उतरलेला अनुभवला. मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांना, जिथे बूथ लागले तिथे येऊन घराघरांतून जेवण आणून दिलं जात होतं.

मतमोजणीचा दिवस उजाडला आणि जनताजनार्दनाच्या ताकदीपुढे मस्तवाल सत्ता भिरकावली गेल्याचं चित्र दिसलं. जनतेनं हातात घेतलेली ती बहुधा पहिली आणि शेवटची निवडणूक होती. ती विसरणं अशक्य आहे.

(लेखक ज्येष्ठ संपादक आहेत )

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा