शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कोरेगाव बंधाऱ्यात मोठी पाणीगळती

By admin | Updated: January 31, 2017 03:51 IST

भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. नदीपात्रात वेळोवेळी सोडलेले पाणी गळक्या बंधाऱ्यातून

आंबेठाण : भामा-आसखेड धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. नदीपात्रात वेळोवेळी सोडलेले पाणी गळक्या बंधाऱ्यातून वाहून जात असल्याने नदीच्या दुतर्फा असणारी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.भामा नदीवर भामा-आसखेड हे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या कालव्याचे काम रखडले असून धरणात जवळपास आठ टीएमसी पाणीसाठा होत असतो. पावसाळा संपल्यानंतर खालच्या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार आणि गरज असेल तेव्हा धरणातून पाणी सोडले जाते. त्यामुळे भामा नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या शेतीची तहान भागते, तसेच नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजनादेखील सुरू राहतात. नदीपात्रात पाणी साचून राहावे, म्हणून ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत.परंतु अनेक ठिकाणी या बंधाऱ्याला बसविण्यात आलेले लोखंडी ढापे हे जीर्ण झाल्याने ते गळू लागले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात कितीही पाणी सोडले तरी ते वाहून जात आहे. जुने आणि जीर्ण झालेले ढापे बदलणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. या पाण्याच्या भरवशावर भामा खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांकडून बागायती शेती केली जात आहे. त्यामधून ऊस, पालेभाज्या, कांदापिक, तसेच अनेक नगदी पिकांचे उत्पन्न घेतले जात आहे. गळती थांबवली नाही तर या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पाणी योजना बंद पडतील, तर विहिरींची पाणीपातळी कमी होईल. (वार्ताहर)