शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

पाणीटंचाईचे मोठे सावट, तलाव-बंधारे कोरडे ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:25 IST

पावसाची पाठ : पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्यातील अनेक तलाव-बंधारे कोरडे ठणठणीत

नीरा : कायम दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या पुरंदरचा दक्षिण-पूर्व पट्टा परतीच्या पावसातही हुकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली दोन वर्षे सतत दुष्काळ पडल्याने बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. विहिरींच्या पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.

पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी, वाल्हा गावच्या पूर्वेकडील अंबाजीचीवाडी, मुकादमवाडी, गायकवाडवाडी, नव्या निर्माण झालेल्या सुकलवाडी, वाघदरवाडीसह वाड्या-वस्त्यांवर सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. ऐन हंगामात विहिरींची पाणीपातळी घटल्याने शेतकºयांसमोर पुढील काळात भेडसावणाºया टंचाईसदृश परिस्थितीचे चित्र उभे राहिले आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी काढणी सुरू आहे. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभºयाची पेरणी करावी की नाही असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. पावसाच्या आशेवर काही शेतकºयांनी कांदालागण केली आहे. पण अजूनही पावसाने हुलकावणी दिल्याने कांदा उत्पादक संकटात सापडला आहे.पावसाळ्यापूर्वी वळवाच्या पावसाने सुरुवात चांगली झाली होती. पण मॉन्सूनच्या पावसाने पाठ फिरवली व नंतर परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. गतवर्षी पुरंदरच्या दक्षिण-पूर्व पट्ट्यात सरासरीच्या तुलनेत साठ टक्के पाऊस झाला होता. त्याचा परिणाम जानेवारीलाच जाणवू लागला होता. तशीच काही परिस्थिती आजच जाणवत आहे. वाल्हे गावच्या पूर्वेकडील रेल्वे लाईन जवळचे तळे, राख येथील फांज ओढ्यावरील बंधारा, ब्रिटिशकालीन तलाव,नावळी खिंडीतील एकाही तलावात पाणी दिसत नाही.लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावासुकलवाडी गावात यावर्षी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे काम झाले आहे. पण पाऊसच पडला नसल्याने सीसीटी बंधाºयात पाणी जमा झाले नाही. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शासनाने लवकरच दुष्काळ जाहीर करावा.- धनंजय पवार, उपसरपंच, सुकलवाडी

टॅग्स :Puneपुणे