शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

पालखीमार्गाचे भूसंपादन सुरू, १८ गावांच्या हद्दीतील जमीन संपादित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:39 IST

संत तुकाराममहाराज पालखीमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने हाती घेतलेले असून, देहू पालखीमार्गाचे पाटस-वासुंदे-बारामती बाह्यवळणाच्या राष्ट्रीय महामार्ग ६५च्या चौकापासून सुरू होणाऱ्या रस्त्यासाठी

वासुंदे - संत तुकाराममहाराज पालखीमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने हाती घेतलेले असून, देहू पालखीमार्गाचे पाटस-वासुंदे-बारामती बाह्यवळणाच्या राष्ट्रीय महामार्ग ६५च्या चौकापासून सुरू होणाऱ्या रस्त्यासाठी भूखंड संपादित करण्यात येणा-या बांधील अथवा मोकळ्या जमिनीचे विवरण सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने ४ एप्रिल २०१८ रोजी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केले आहे.या दुसºया टप्प्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५च्या बारामती फाटा ते बारामती व बारामती बाह्यवळण मार्गाच्या कामासाठी दौंड तालुक्यातील पाटस, रोटी, हिंगणीगाडा व वासुंदे; तर बारामती तालुकयातील खराडेवाडी, उंडवडी सुपे, जराडवाडी, उंडवडी क.प., बºहाणपूर, मेडद, बारामती, गोजूबावी, कटफळ, वंजारवाडी, रुई, सावळ, कण्हेरी, पिंपळी अशा एकूण १८ गावांच्या हद्दीतील जमीन संपादित होणार आहे.सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे संपादित केल्या जाणाºया जमिनीसंदर्भात ज्या व्यक्ती व ज्यांचे संबोधित जमिनीशी हितसंबंध आहेत त्यांनी आपले आक्षेप, हरकती अथवा सूचना अधिनियम प्रसिद्धीच्या दिनांकापासून ४ मार्च पासून २१ दिवसांच्या आत सक्षम अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी (भूमी संपादन) यांच्याकडे लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवावे लागणार आहेत.याची सुनावणीही त्याच ठिकाणी होईल. मात्र, पालखीमार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू होऊनदेखील अनेक गावांतील बाधित शेतकरी हे नेमकी किती व कोणती जमीन जाणार,त्याचा मोबदला किती मिळणार, याबाबत अनभिज्ञ आहेत. तसेच,या मार्गाच्या संभाव्य भूसंपादनामध्ये अनेक शेतकºयांच्या विहिरी,घरे, कूपनलिका व पक्कीबांधकामे जाणार असल्याने शेतकºयांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माणझाले आहे. याबाबत स्थानिक शेतकºयांना कोणाकडून माहिती मिळणार, असा प्रश्न निर्माणझाला आहे.यासाठी भूसंपादनामध्ये बाधित होणाºया शेतकºयांना संबंधित अधिकारीवर्गाने विश्वासातघेऊन खरी माहिती देणे गरजेचेआहे. त्याचबरोबर, प्रत्येक गावात जाऊन शेतकºयांशी संवादसाधल्यास भूसंपादन प्रक्रिया पार पडण्यात अडचणी येणार नाहीत. अन्यथा, शासकीय अधिकारीवर्गाने फक्त कागदी घोडे नाचवूनस्थानिक शेतकºयांचा रोष पत्करून जर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू ठेवली, तर स्थानिक शेतकरी व नागरिकांचा विरोध हा वाढता राहील.सुनावणी जवळच्या ठिकाणी व्हावीसंपादित केल्या जाणाºया जमिनीसंदर्भात आक्षेप, हरकती अथवा सूचना मांडण्यासाठी या भागातील शेतकºयांना पुण्याला हेलपाटे मारावे लागणार आहेत. प्रामुख्याने या पालखीमार्गासाठी दौंड व बारामती तालुक्यातील जमीन संपादित केली जाणार असल्याने जमीन संपादनाबाबत सक्षम अधिकारी यांचे कार्यालय बारामती शहरात असल्यास दोन्ही तालुक्यांतील नागरिकांना सोयीचे होईल. यासाठी हे कार्यालय बारामती या ठिकाणी व्हावे, अशी मागणी वासुंदेच्या सरपंच नंदा जांबले तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नितीन हाजबे यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या