शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

लक्ष्मी रस्त्यावर यंदाही ‘दणदणाट’

By admin | Updated: September 29, 2015 01:54 IST

पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दर वर्षीप्रमाणेच यंदा देखील पारंपरिक वाद्ये व डीजेचा थरार यांनी लक्ष्मी रस्ता दणाणून सोडला

पुणे : पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत दर वर्षीप्रमाणेच यंदा देखील पारंपरिक वाद्ये व डीजेचा थरार यांनी लक्ष्मी रस्ता दणाणून सोडला. पथकांची संख्या कमी करूनदेखील अवाढव्य ढोल-ताशा पथकांमुळे यंदा मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत देखील ध्वनिप्रदूषणाने कमालीची उंची गाठली होती. परंतु, संपूर्ण विसर्जन मिरवणुकीचा विचार करता गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत यंदा ध्वनिप्रदूषणामध्ये काही प्रमाणात घट झाल्याचे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या नोंदीवरून स्पष्ट झाले.पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने लक्ष्मी रस्त्यावरील १० चौकात दर चार तासांच्या अंतराने रविवार दुपारी १२ ते रात्री १२ व दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. यामध्ये सर्वांधिक १०४.१ डेसिबल्स आवाज रात्री ८ ते १२ या कालावधीत नोंदविला गेला. तर, लिंबराज महाराज आणि कुंटे चौकात सरासरी आवाजाची शंभरी ओलांडली. नामांकित आणि अवाढव्य ढोल-ताशे पथकांमुळे दिवसादेखील आवाजाची पातळी अधिकच आढळून आली. मानाच्या गणपतीसमोरील ढोल-ताशाचा दणदणाट दुपारी बारा ते चारदरम्यान शंभर डेसिबल्सच्या पुढे होता. तर, रात्री १२ नंतर उच्च न्यायालयाची मर्यादा असूनही मंडळाचा आवाज जवळपास तेवढाच असल्याची नोंद झाली. यंदा सरासरी आवाज १०४ डेसिबल्स इतका नोंदविण्यात आता. गत वर्षी हाच आवाज ११५ डेसिबल्स इतका होता. विद्यार्थी कल्याण मंडळाचे मुरली कुंभारकर यांच्या नेतृत्वाखाली सदानंद करुकवाड, अतुल इंगळे, नीलेश वाणी, रोहित गावडे, अवधूत जाधव आणि दिनेळ वाळुंजे या विद्यार्थ्यांनी रविवारी दुपारी १२ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत लक्ष्मी रस्त्यावर ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. -----------मिरवणूक शांततेतपोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि पोलीस मित्र, सामाजिक संघटनांची पोलिसांना झालेली मदत, यामुळे शहरातील विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. पोलिसांच्या चारही परिमंडलांसोबत मुख्य विसर्जन मार्गांवरील मिरवणुका किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडल्या. मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये दर वर्षी होणारा संघर्ष या वर्षी टाळण्याचा पोलिसांचा प्रयत्न यशस्वी ठरला. मानाच्या गणपतींचे विसर्जन व्हायला उशीर झाल्यामुळे पोलिसांना विसर्जन मिरवणूक लांबण्याची भीती वाटत होती. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ही मिरवणूक २० मिनिटे आधी संपवण्यात यश आले. पोलिसांनी मंडळांना कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकल्याने तसेच बंधने न घातल्याने विसर्जन मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांची चंगळ झाली. मानाच्या गणपतींना तीन पथकांना, तर अन्य मंडळांना दोन पथकांना परवानगी देण्यात आली होती. परंतु बहुतेक मंडळांनी तीन पथके मिरवणुकीमध्ये उतरवली होती. परंतु पोलिसांनी मंडळांना कोणतीही आडकाठी केली नाही. पोलिसांनी केवळ सुरक्षा आणि गर्दीचे नियंत्रण या दोनच गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या होत्या. मंडळांवर कोणतेही नियंत्रण पोलिसांनी ठेवलेले नव्हते. गर्दीचे नियंत्रण करण्यामध्ये पोलीस मित्र आणि कार्यकर्त्यांची मोठी मदत पोलिसांना झाली. बेलबाग चौकात स्वत: पोलीस आयुक्त के. के. पाठक, सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त (विशेष शाखा) श्रीकांत पाठक, तुषार दोषी, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी बंदोबस्ताचे नियंत्रण करीत होते. तर टिळक चौकामध्ये अतिरिक्त आयुक्त पी. एन. रासकर, उपायुक्त (गुन्हे) पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता. साडेतीन हजार पोलीस व ३ हजार स्वयंसेवकांच्या मदतीने गणेशोत्सवाची सांगता शांततेत झाली.