शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जिल्ह्यात पाण्याअभावी भातशेती संकटात, खाचरे कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:55 IST

 पिकांवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून पाहणीचे आदेश

डिंभे : भातशेतीचे आगर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर या तालुक्यातील भातशेती हंगामाच्या अंतिम टप्प्यावर संकटात सापडली आहे. भातखाचरे कोरडी पडू लागल्याने भातउत्पादक हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी सुमारे ६८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती होते.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर हे तालुके प्रामुख्याने भातशेतीचे आगर म्हणून ओळखले जातात. दरवर्षी या तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर भातशेती होते. विशेषत: आदिवासी जनतेच्या जीवनाचा भातशेती मुख्य आधार मानली जाते. उदरनिर्वाहासाठी आवश्यक उत्पादन पदरी ठेवून या भागातील शेतकरी तांदूळविक्रीतून आपल्या गरजा भागवीत असतो. शहरी भागातील तांदळाची गरज भागविली जाते.

इंद्रायणी, रायभोग, जिर, आंबेमोहर, कोलम, कोळंबा या पारंपरिक जातीचे उत्पादन घेतले जाते. यंदाही या भागातील भातउत्पादक जोमाने कामाला लागला होता. सुरुवातीपासून भातशेतीसाठी पूरक हवामान व पाऊस राहिल्याने समाधानी होता. पेरणीसाठी काही ठिकाणी पावसाची वाट पाहावी लागली तरी काहींनी धूळपेरणी केली होती. मात्र यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने सर्व पेरण्या कारणी लागल्या होत्या. उलटपक्षी लागवडी वेळेत उरकल्याने समाधान होते. मात्र ऐन भातशेती जोम धरण्याच्या काळात असतानाच महिन्याभरापासून पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी तर दीड महिना पावसाने हजेरी लावली नाही. परतीचा पाऊसही झाला; मात्र पूर्व भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने भातशेतीला फायदा झाला नाही. भातशेतीला सध्या मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. महिना-दीड महिन्यापासून भातखाचरे कोरडी पडल्याने भातशेती पिवळी पडू लागली आहे. अनेक ठिकाणी करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हातातोंडाशी येऊ लागलेले पीक हातचे जाते की काय, या भीतीपोटी शेतकरीवर्गामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

आंबेगाव तालुक्यातील शेतकºयांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘हंगामाच्या सुरुवातीला भरपूर पाऊस झाल्याने यंदा खंडीची पेंडी होईल, अशी आशा होती. पण आसळकाचा पाऊस झालाच नाही. वाहन घोडा असल्याने तो घोड्यासारखाच निघून गेला. पुढे मघा, पूर्वा या सासू-सुनांचा पाऊसही रुसव्या-फुगव्यासारखाच झाला. नवचंडीत पावसाची कृपा झाल्यास निम्मे अर्धे उत्पादन हाती लागण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी पाऊस नसल्याने हंगाम वाया चालला आहे.’’

टॅग्स :Farmerशेतकरी