शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाण्याअभावी भातशेती संकटात, खाचरे कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:55 IST

 पिकांवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाकडून पाहणीचे आदेश

डिंभे : भातशेतीचे आगर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर या तालुक्यातील भातशेती हंगामाच्या अंतिम टप्प्यावर संकटात सापडली आहे. भातखाचरे कोरडी पडू लागल्याने भातउत्पादक हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील हजारो लोकसंख्येच्या जीवनाचा मुख्य आधार समजली जाणारी सुमारे ६८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातशेती होते.

जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर हे तालुके प्रामुख्याने भातशेतीचे आगर म्हणून ओळखले जातात. दरवर्षी या तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर भातशेती होते. विशेषत: आदिवासी जनतेच्या जीवनाचा भातशेती मुख्य आधार मानली जाते. उदरनिर्वाहासाठी आवश्यक उत्पादन पदरी ठेवून या भागातील शेतकरी तांदूळविक्रीतून आपल्या गरजा भागवीत असतो. शहरी भागातील तांदळाची गरज भागविली जाते.

इंद्रायणी, रायभोग, जिर, आंबेमोहर, कोलम, कोळंबा या पारंपरिक जातीचे उत्पादन घेतले जाते. यंदाही या भागातील भातउत्पादक जोमाने कामाला लागला होता. सुरुवातीपासून भातशेतीसाठी पूरक हवामान व पाऊस राहिल्याने समाधानी होता. पेरणीसाठी काही ठिकाणी पावसाची वाट पाहावी लागली तरी काहींनी धूळपेरणी केली होती. मात्र यंदा पावसाने चांगली साथ दिल्याने सर्व पेरण्या कारणी लागल्या होत्या. उलटपक्षी लागवडी वेळेत उरकल्याने समाधान होते. मात्र ऐन भातशेती जोम धरण्याच्या काळात असतानाच महिन्याभरापासून पावसाने ओढ दिली आहे. काही ठिकाणी तर दीड महिना पावसाने हजेरी लावली नाही. परतीचा पाऊसही झाला; मात्र पूर्व भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने भातशेतीला फायदा झाला नाही. भातशेतीला सध्या मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. महिना-दीड महिन्यापासून भातखाचरे कोरडी पडल्याने भातशेती पिवळी पडू लागली आहे. अनेक ठिकाणी करपासदृश रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हातातोंडाशी येऊ लागलेले पीक हातचे जाते की काय, या भीतीपोटी शेतकरीवर्गामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

आंबेगाव तालुक्यातील शेतकºयांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, ‘‘हंगामाच्या सुरुवातीला भरपूर पाऊस झाल्याने यंदा खंडीची पेंडी होईल, अशी आशा होती. पण आसळकाचा पाऊस झालाच नाही. वाहन घोडा असल्याने तो घोड्यासारखाच निघून गेला. पुढे मघा, पूर्वा या सासू-सुनांचा पाऊसही रुसव्या-फुगव्यासारखाच झाला. नवचंडीत पावसाची कृपा झाल्यास निम्मे अर्धे उत्पादन हाती लागण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी पाऊस नसल्याने हंगाम वाया चालला आहे.’’

टॅग्स :Farmerशेतकरी