शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

बालेवाडी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये सोयी सुविधा आणि स्वच्छतेचा अभाव; नागरिकांकडून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 20:43 IST

अनेक नागरिकांना आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याबाबत कल्पना देण्यात आलेली नाही..

ठळक मुद्देनागरिक त्यांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट मिळावेत अशी करत आहेत मागणी

पाषाण :  पुणे शहरातील विविध भागातून कोरोना बाधित असलेले रुग्ण तसेच क्वारंटाईन करण्यात आलेले नागरिक यांच्या वर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने निकमार कॉलेजमध्ये सेंटर उभारण्यात आले आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या वतीने बालेवाडी येथे तयार करण्यात आलेले निकमार कॉलेजमधील क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांना त्यांच्या आरोग्याबाबत योग्य माहिती न मिळाल्याने संताप व्यक्त करत आहेत. तसेच योग्य सुविधा मिळत नसल्याने या सेंटरवर असलेले अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे बरे होऊन बाहेर पडलेल्या काही नागरिकांनी देखील सुविधांबाबतच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

अनेक नागरिकांना आपल्याला कोरोना झाला आहे किंवा नाही याबाबत कल्पना देण्यात आलेली नाही. तर कोणतीही लक्षणे आढळत नसलेल्या लोकांना देखील या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याची तक्रार नागरिक करत आहे. काही नागरिकांना फक्त तोंडी कोरोना झाला असल्याचे सांगितले जात आहे. नागरिक त्यांचे टेस्टचे रिपोर्ट मिळावेत अशी मागणी करत आहेत. 

 निकमार सेंटरमध्ये नागरिकांना प्यायला गरम पाणी दिले जात नाही तर अनेक नागरिक आपल्या नातेवाइकांकडून गरम पाणी आणत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आंघोळीला गरम पाणी नसल्याने थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. यामुळे सर्दी खोकला यासारखे देखील वाढत असल्याचे काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. जेवणाची गुणवत्ता याबाबत देखील अनेक नागरिक तक्रार करतात. परंतु, याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. परिसराच्या स्वच्छतेबाबत वारंवार तक्रारी करून देखील कारवाई केली जात नाही तसेच रुग्णांना देण्यात आलेल्या खोल्यांची स्वच्छता देखील वेळेवर होत नाही.खोलीमध्ये दररोज आरोग्य तपासणी व्हावी स्वच्छता तसेच साफसफाई नियमित केली जावी व गरम पाणी देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत. 

 क्वारंटाईन असलेले धनराज मोरे म्हणाले, आमची टेस्ट केल्यानंतर आम्हाला करून झाला आहे असे सांगून सेंटरमध्ये करण्यात आले आहे. परंतु येथे आल्यानंतर देण्यात आलेल्या रूमची स्वच्छता करण्यात आली नव्हती. गुणवत्ता पूर्ण जेवण दिले जात नाही दररोज चेक देखील केले जात नाही. आजारी पडलेल्या रुग्णांना स्वतः खाली डॉक्टरांकडे जावे लागते.  क्वारंटाईन केलेले नागरिक व रुग्ण यांची दररोज आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे असे असताना देखील आरोग्य तपासणी होत नाही. 

सहाय्यक आयुक्त जयदीप पवार म्हणाले,  वाढत असलेल्या पेशंटची संख्या यामुळे यंत्रणेवरील ताण वाढत आहे. समस्या लक्षात आल्यानंतर तात्काळ उपाय योजना करण्यात येत आहे.

टॅग्स :Balewadiबालेवाडीcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका